परदेशात नोकरीचे आमिष दाखवून दलालांमार्फत फसवुुन नेलेल्या महिलांची राज्य महिला आयोगांकडून सुटका …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:

आयोगाची अध्यक्षा म्हणून काम करताना आजचा सर्वाधिक आनंद म्हणजे “परदेशातून सुटका करून महाराष्ट्रात आणलेल्या महिला आणि मुलीच्या चेहऱ्यावरील समाधान” हे माझ्या पुढील कार्याला बळ देणारे आहे.

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून दलालांच्या माध्यमातून फसवून नेलेल्या महिलांची राज्य महिला आयोगाने विशेष मोहिम राबवून या महिलांची सुटका केली.

आपल्या देशात महिलांचा सन्मान केला जातो, मात्र काही दलाल महिलांची तस्करी करून, त्यांना फसवून परदेशात पाठवतात. पुणे, मुंबई, नागपूर सारख्या महानगरांमधून अनेक दलालांमार्फत महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या कडून भरपूर पैसे उकळून दुबई, ओमान, सौदी अरेबिया सारख्या देशांत पाठवले जाते.

या महिला परदेशात गेल्यावर त्यांच्या कडील पासपोर्ट व इतर महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली गेली, त्यांना कबूल केलेला पगार दिला नाही, त्यांना वेळेवर पुरेसं जेवण देखील दिले जात नव्हते.

या महिलांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगासोबत फोन, मेलच्या माध्यमातून संपर्क साधला. याची तात्काळ आणि गंभीरपणे दखल घेऊन महिला आयोगाने परराष्ट्र मंत्रालय व Ambassy यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार केला. आपल्या देशातील महिलांना घेऊन येण्यासाठी हवे ते सर्व प्रयत्न केले आणि या देशाच्या लेकींची परदेशातून सुटका करून त्यांना सुखरूप आणले.

आपल्या राज्यातील महिलांची फसवणूक दलालांकडून होऊ नये, त्यांची तस्करी होऊ नये या दृष्टीने राज्य महिला आयोग विशेष लक्ष देऊन काम करत आहे. राज्यातील अशा दलालांची माहिती घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या दृष्टीने राज्य महिला आयोग पाऊल टाकत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत यावेळी अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी काढले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट