सर्वांगीण विकासाचे धोरण राबवीत असताना आदिवासी विकासाला प्राधान्य-उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने सोबत काम केल्यास विकास जलद गतीने होईल -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

दिनांक 15 : सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, 250 शासकीय आश्रम शाळेची आदर्श शाळा म्हणून दर्जोन्नती, अनुसूचित जमातीच्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनां शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्याचे धोरण शासनाचे असून सर्वांगीण विकासाचे धोरण राज्यामध्ये राबवीत असताना आदिवासी बांधवांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जव्हार येथे विविध विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी आभासी पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आभासी पद्धतीने नागरिकांना मार्गदर्शन केले
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्मित जव्हार येथील तहसील कार्यालय नागरिकाचे व आदिवासी बांधवांचे आशास्थान असून हे कार्यालय जनसेवेचे नवे आदर्श निर्माण करेल तसेच पारदर्शक व तत्पर कामाची ओळख निर्माण करेल.

जव्हार येथील 100 खाटाचे रुग्णालय अपुरे पडत असल्यामुळे आता दोनशे खाटांचे रुग्णालय बांधण्यात येत आहे या रुग्णालयांमुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होतील. जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या तालुक्यातील नागरिकांना देखील या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. जव्हार परिसरात मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 16 कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले..

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न सोडवून आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यात येणार आहे
जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत जिल्ह्यामध्ये विकास कामे करून जिल्हा प्रशासनाने निधी पूर्ण खर्च करावा.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने सोबत काम केले तर जिल्ह्याचा विकास जलद गतीने होण्यास मदत होईल
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न राज्य शासनाने मार्गी लावले आहेत तसेच एन एच आर एम च्या कर्मचाऱ्यासंदर्भात देखील शासन सकारात्मक निर्णय घेत आहे
पोलीस पाटलांच्या मागणीनुसार त्यांच्या मानधनात 12 हजार रुपयांपर्यंत वाढ करावी अशी मागणी होती. परंतु शासनाने त्यांच्या मागणीपेक्षा जास्त 15 हजार रुपये मानधनात वाढ केली असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जव्हार तहसील कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण, जवाहर नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन, खडखड पाणी योजनेचे लोकार्पण, जव्हार पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन, जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामाचे लोकार्पण, अंगणवाडी सेविका यांना शासनामार्फत मोबाईल वाटप, पालघर येथील 100 बेडचे, मेडिकल रिसर्च सेंटर साठी 28 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी, विरार येथे 30 खाटांचे चे ग्रामीण रुग्णालयासाठी 24 कोटी रुपये मंजूर, पालघर येथील सिडकोच्या मालकीची जागा मेडिकल कॉलेजला हस्तांतर करण्यासाठी मंजुरी, या विकास कामाचे लोकार्पण झाले असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट