तारणे येथील मुख्य मार्गावरील साचणाऱ्या पाण्याच्या त्रासापासून आखेर मिळाली जनतेला सुटका.

0
Spread the love

रस्ता लगत अतिक्रमनाविरोधात आखेर सा.बां. उपविभाग माणगांव ची धडक कारवाई..

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव रायगड

माणगांव :-माणगांव तालुक्यातील कुमशेत ग्रामपंचायत हद्दीतील तारणे गावातून जाणारा मुख्य मार्ग हा दक्षिण माणगांव तालुक्यातील अनेक गावांचा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व दापोली तालुक्यातील जनतेचा व पर्यटकांचा मुंबई पुणेकडे येण्या जाण्यासाठीचा माणगांव येथे पोहचण्याचा जवळप्रवास चा मुख्य मार्ग आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून तारणे येथील काही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जमिनी लगत कालवा विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करता करता सार्वजनिक बांधकाम विभाग च्या मुख्य रस्त्या लगत जमिनीवर व गटारावर देखील अतिक्रमण केल्यामुळे मुख्य मार्गा लगत वाहणारा गटार पूर्णपणे बंद झाला होता त्यामुळे पावसाळ्यात तारणे गावातून वाहणाऱ्या पाणी मुख्य रस्त्यावर साचून तारणे स्टॉप नजीक मुख्य मार्ग जलमय होऊन मुख्य मार्गाला पावसाळ्यात सतत तलावाचे स्वरूप प्राप्त व्हायचे. त्यामुळे दर रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या पायी चालणाऱ्या, सायकल व दुचाकी सवार तसेच रिक्षातील प्रवाशांना डोक्यावर छत किंवा छत्री असून देखील साचलेल्या पाण्यातून न भिजता, स्वच्छ कपडे राखत हा जलमय मार्ग पार करण्याकरिता खूपच कसरत करावी लागत होती.

काही ग्रामस्थांच्या अतिक्रमणामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाची बाब गांभीर्याने घेत स्थानिक ग्रामपंचायत पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदरील होणाऱ्या त्रासाचा निवारण करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला व पत्रकारांकडून देखील जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत अनेक बातम्या प्रसारित करण्यात आले होते. स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ या त्रासाचे निवारण होणे गरजेचे होते मात्र बरेच पावसाळे जैसे थे असा चित्र सतत सुरु होता आखेर यंदाच्या पावसाळ्या आधी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव कडून गांभीर्याने निर्णायक निर्णय घेत ३० मे रोजी दोन जे सी बी द्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत मुख्य मार्गालागत गटारवरील अतिक्रमन हटवून गटार खोदण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून आखेर अतिक्रमनाविरोधात केलेल्या उशिरा मात्र धडक कारवाईमुळे नाहक होणाऱ्या त्रासाचा विषय मार्गी लागल्यामुळे विध्यार्थी पर्यटक व जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट