तलासरी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध अधिनियमानुसार एकूण ५ आरोपींवर केली धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :

तलासरी येथे राहणाऱ्या एका महिलेने तलासरी पोलीस ठाणेत येवून तक्रार दिली की, पिडीत महिला ही तीचे पती यांचे ओळखीचे इसम आरोपी नं. १ रविंद्र नारायण भाटे, आरोपी नं.२ दिलीप गोंविद गायकवाड, आरोपी नं. ३ गौरव संतोष साळवी, आरोपी नं.४ महेंद्र कुमावत रा. काल्हेर, आरोपी नं.५ गणेश कदम यांच्याशी संपर्कात आली होती. सदर आरोपीने तिच्या घरात वास्तुदोष आहे, तसेच तिच्या नवऱ्यावर करणी झाली आहे. तीच्याकडे सुखशांती नांदण्याकरीता काही पुजा कराव्या लागतील व आरोपी सांगतिल त्याप्रमाणे कृती केल्यास तिचा संसार सुखी होईल तसेच तिच्या नवन्यास सरकारी नोकरी लागेल असे आरोपींनी सांगितले.

यातील नमुद आरोपी यांनी फिर्यादीच्या घरातील इतर सदस्यांचा विश्वास संपादन केला. आरोपी माहे एप्रिल २०१८ मध्ये तलासरी परिसरातील फिर्यादीचे घरी आले. त्यांनी फिर्यादीच्या घरातील करणी काढण्याकरीता आणि नवऱ्याला सरकारी नोकरी लागण्याकरीता अघोरी पुजा मांडली व सदर पुजेत फिर्यादीस एकटीला बसवून फिर्यादीच्या घरातील इतर सदस्यांना पुजा होईपर्यंत पुजेत विघ्न नको म्हणुन घराबाहेर राखन बसविले. आरोपी क्रमांक १ याने आरोपी क्रमांक २ ते ५ यांना घराबाहेर राखन करण्यास सांगितले. त्यादरम्यान फिर्यादीस पंचामृत म्हणुन पेय पिण्यास देवून बेशुध्द केले व ती बेशुध्द असतांना फिर्यादीवर बलात्कार केला. त्याचबरोबर पुजेकरीता सोने व पैसे देखील घेतले.

तसेच सन २०१९ मध्ये फिर्यादीची पिडा दुर व्हावी म्हणून फिर्यादीस आणि तीच्या पतीस येऊर, ठाणे येथे बोलावून तेथेदेखील अघोरी पुजा केली. त्यानंतर फिर्यादीस कांदीवली मुंबई येथे आरोपी क्रमांक १ यांच्या मठात बोलावून अघोरी पुजेचा घाट घालून आरोपी क्रमांक २ याने फिर्यादीशी जबरी संभोग केला. त्यानंतर जुन २०२२ मध्ये यातील आरोपी क्रमांक १, २ व ३ यांनी फिर्यादीस पुजेकरीता लोणावळा येथील एका रिसोर्टवर बोलावून आरोपी क्रमांक ३ याने मद्यपान केले व आरोपी क्रमांक १ व ३ यांनी फिर्यादीबरोबर जबरी संभोग केला.

अशाप्रकारे वेळोवेळी यातील वर नमुद आरोपीतांनी फिर्यादीकडून एकूण २,१०,०००/- रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागीने घेऊन आर्थीक व शारिरीक शोषण केल्यामुळे फिर्यादी निराशाग्रस्त झाल्या व त्यातुन फिर्यादी यांच्या आईने फिर्यादीच्या मनस्थिती बिघडली असल्याचे लक्षात घेवुन विचारपुस केली असता वर नमुद प्रकार उघडकीस आला व फिर्यादीचे आईने हिंमत दिल्यावरुन फिर्यादी यांनी दिनांक ११/०९/२०२३ रोजी पोलीस ठाण्यात येवून सविस्तर तक्रार दिल्याने तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २२८/२०२३ भा.दं.वि.सं. कलम
३७६,३७६(२)(N), ४२०, ३४ सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम २,३,८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विजय मुतडक, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने यातील आरोपीतांचा शोध घेण्याकरीता वेगवेगळी पथके बनविली. सदर पथकांनी गोपणीय माहितीच्या आधारे यातील आरोपी क्रमांक १ यास कांजुरमार्ग मुंबई परिसरातुन आणि आरोपी क्रमांक २ यास ठाणे, येऊरच्या जंगल परिसरातून गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले, तसेच आरोपी क्रमांक ३ यास देखील ताब्यात घेण्यात आले असुन आरोपी क्रमांक ४ व ५ यांचा शोध घेण्याकरीता स्वतंत्र पथक नेमुन शोध घेऊन आरोपी क्रमांक ४ यास काल्हेर भिवंडी परिसरातुन व आरोपी क्रमांक ५ यास सुध्दा ठाणे परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे. यातील आरोपीत यांचा फसवणुक व हातचलाखी बोलण्यात गुंगविणे यात हातखंडा असल्याने यातील आरोपीतांनी सुरवातीला पोलीसांना दाद दिली नाही. परंतु काही वेळात पोलीसांनी पोलीसी हिसका दाखविताच आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली. सदर गन्ह्याचा अधीक तपास हा मपोउपनि / रिजवाना ककेरी, नेमणुक तलासरी पोलीस ठाणे या करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विजय मुतडक, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे, सपोनि / दत्ता शेळके, पोउनि / समिर लोंढे, मपोउनि / रिजवाना ककेरी व तलासरी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.

पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, घरातील / जिवनातील दु:ख / आपल्या मनासारखी गोष्ट न घडणे यासारख्या विधीलिखीत बाबींवर कोणतेही जादुटोणा / भगत / अघोरी विद्या उपाय ठरत नसते. याद्वारे समाजातील विकृत लोक अशा बळी पडलेल्या व्यक्तींचे सर्वांगिण शोषण करीत असतात. ही गोष्ट लक्षात घेवुन अशा भोंदु लोकांच्या भुलथापांना बळी न पडता सजग राहुन विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन आजमावा आणि अंधश्रद्धा निर्मुलनात स्वतःचे योगदान द्यावे ही विनंती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट