मुंबई गोवा महामार्गासाठी आमरण उपोषण करण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीतर्फे विशेष आव्हान..

संपादिका – दिप्ती भोगल
माणगांव :– मागील १७ वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्टला आमरण उपोषणास उपस्थित राहण्यास जन आक्रोश समितीचे संपुर्ण कोकणकराना आव्हान करण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये १९२७३०८ कोकणकरांनी मतदान केले.
रायगड -१०१३२७०
रत्नागिरी-९१४०३८
यातील ५०% मतदार हे मुंबईतून गेले असतील असे गृहीत धरू (आकडा जास्त असू शकतो).
कोकणकरांनो मुंबई गोवा महामार्ग विषय हा २० लाख कोकणकरांचा विषय आहे मग याविषयासाठी किमान ०. ५ टक्के कोकणकर देखील आवाज उठवत नाहीत, मग खरच आपल्याला महामार्गाची गरज नाही का?
सर्वांनी पक्ष बाजूला ठेऊन कोकणकर म्हणून येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता आपल्या हक्कासाठी, हक्काच्या महामार्गासाठी माणगाव येथे उपस्थित राहूया.
मी एक कोकणकर आणि कोकणातील मतदार म्हणून या आंदोलनात सामील होणार…! असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com