समाज सेवक श्री. विनोद चाळके अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित..

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

चिपळूण:

     अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाच्या वतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथील पटांगणावर आयोजित कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.सदर सोहळ्यात श्री. विनोद सदानंद चाळके अध्यक्ष -संवेदना फॉउंडेशन यांच्या सामाजिक कार्याची दखल व त्यांनी आपली सेवा अविरतपणे समाज्यातील वंचित अंध, अपंग, कुष्ठरोगी यांची सेवा तसेच रुग्ण सेवेच्या माध्यमातून त्यांना आधार देण्याचे कार्य तसेच पर्यावरण समतोल, शिक्षणक्षेत्रात विध्यार्थ्यांना मदत करणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं कार्य ते गेली 20 वर्षापासुन करत आहेत त्यांनी रायगड, रत्नागिरी तसेच मुबंई मद्येही सामाजिक कामाचा चढता आलेख पाहून अखिल भारतीय मराठा महासंघाने दखल घेतली तसेच या कीर्तन महोत्सवात समाज्यातील विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मराठा भूषण पुरस्कार - 2025 पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

  समाजहितासाठी समर्पित कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन गौरव करणे ही समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आहे. सदर भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील अशा उतुंग  कार्य करणाऱ्या  व्यक्तींचाही मराठा भूषण पुरस्कार -2025 देऊन सन्मान केला त्यात छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे बरा बलुतेदार आणि आठरा पगड जातीतील गुणवंताचा सन्मान करून मराठा समाज सर्व जाती-धर्मा आदर करणारा समाज आहे तसेच कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि मराठा समाजाच्या प्रगतीला बळकटी देण्याचा हा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय ठरेल.

    कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कीर्तन महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांना शुभेच्छा देत, हा महोत्सव समाजप्रबोधन व संस्कृतीच्या जतनासाठी एक प्रभावी माध्यम असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाभळे यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते तसेच माननीय जगद्गुरु नरेंद्र महाराज यांनीही उपस्थिताना धर्म व समाज बांधणीसाठी मौलीक प्रभोधन केले.

   यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते त्याचप्रमाणे शिवव्याख्याते श्री नामदेवराव जाधव यांचेही व्याख्यान उपस्थिताना एक छत्रपतींच्या इतिहाची पर्वणी ठरली 

या कार्यक्रम प्रसंगी माननीय जगद्गुरु नरेंद्र महाराज, आमदार तथा माजी मंत्री भास्कर शेठ जाधव, मा. श्री शेखर निकम, आमदार,माजी आमदार सदानंद चव्हाण, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीपदादा जगताप,शिवव्याख्याते मा. नामदेवराव जाधव, ॲड.स्वातीताई काशीद, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, संपर्क प्रमुख श्री. विवेक कदम,श्री प्रसाद लाड,ह. भ. प. खोकरे महाराज.श्री कपिल शिर्के, श्रीराम शिंदे, श्री आप्पा खैर अखिल मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट