श्रीवर्धन मध्ये गडबवाडीला बाॅक्साईट मायनिंग खाणकामाचा विळखा..!

0
Spread the love

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल

श्रीवर्धन :

दांडा – बागमांडला व सायगांव ग्रामपंचायतीत सुरु असलेल्या पर्यावरण विरोधी खाणकामाला स्थानिक ग्रामस्थांचा होतोय कडकडून विरोध..!

संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी व विविध संघटनांकडून मायनिंगसाठी विरोध..!

निसर्ग सुंदर अशा कोकणच्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या व जैविक विविधतेवर परिणाम करणाऱ्या या बाॅकसाईट मायनिंग उत्खननाला गडबवाडी देखील विरोध करत असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

गावात मायनिंग आहे की मायनिंग मध्ये गांव आहे अशी भयानक परिस्थित सध्या तरुणांना भेडसावत आहे.

या मायनिंग मुळे ग्रामस्थांना अनेक जिवघेण्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

बाॅकसाईट मायनिंगसाठी सुरूंग लावून करत असलेल्या स्फोटामुळे पिण्याचा पाण्याचा जोर कमी झाला आहे त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

सुरुंगाच्या हादरयाने घराना तडा जाऊन स्थानिकांचे फार मोठे नुकसान होणार आहे.

तसेच वारंवार सुरुंग लावल्याने जमिनीची पकड सैल झाल्यामुळे डोंगराच्या कुशीत वसलेल्या गडबवाडीवर महाड येथील तळीये गावासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती भेडसावत आहे.

धुळीच्या वातावरणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच धुळीमुळे आंबा , काजु व फुलझाडे यांच्या उत्पन्नाची घट झाली आहे.

मायनिंगसाठी खोदलेले ३० फुटाचे खड्डे हे वेळेअभावी न भरल्यामुळे अनेक जनावरांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

गावात २४ तास चालु असलेल्या मोठ्या डंपर / ट्रकच्या कर्कश आवाजामुळे ग्रामस्थांची झोप उडून त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

नविन रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. या मायनिंगच्या भरधाव वेगाने चालणाऱ्या ट्रकच्या धडकेत शेजारील एका ८ वर्षीय सिद्धेश जाधवला आपला जीव गमवावा लागला आहे.

खराब रस्त्यामुळे कितीतरी गाड्या रस्त्यावरून बाहेर फेकल्यामुळे अपघात झाल्यापासून वाचल्या आहेत .

इतकेच काय तर पूर्वीपासून जे सरकारी गौंड (रस्ते) देखील या मायनिंग कंपनीकडून अतिक्रमण करून खोदण्यात आले आहेत.

अशा अनेक समस्यांबाबत संपुर्ण श्रीवर्धन तालुक्यातून स्थानिक ग्रामस्थ आपला आवाज उठवत आहेत व याचे लेखी निवेदन आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना देत आहेत परंतू आजपर्यंत आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडत नाही याची खंत संपुर्ण तालुक्यात स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

याबाबत उठाव करण्यासाठी दिनांक २० मार्च २०२५ रोजी धडक मोर्चाचे आयोजन शिवसेना रायगड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री प्रमोद घोसाळकर यांच्यामार्फत करण्याचे ठरले असताना याला विरोध म्हणून हा उठाव दाबणयासाठी प्रतिमोर्चाचे आयोजन मूठभर धनदांडग्यांच्या हव्यासापोटी ट्रान्सपोर्ट मालक , वाहन चालक- मालक यांच्याकडून काढण्यात आला व तालुक्यात शांतता भंग होऊ नये म्हणून दिनांक १९ मार्च २०२५ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहीता कलम १६८ प्रमाणे मा.जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार १२ मार्च २०२५ ते २६ मार्च पर्यंत जमावबंदीचा आदेश लागु करुन ह्या मोर्चाची परवानगी तूर्तास नाकारण्यात आली.

यामुळेच ग्रामस्थांना वारंवार या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे.व कंपनीच्या दडपशाहीखाली संपुर्ण गाव वावरत आहे.

मग या प्रकल्पांचा वाळी कोण असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात घर करून राहीला आहे.

पण असे स्थानिक नागरिकांवर दुष्परिणाम करणारे प्रकल्प होणे गरजेचे आहे की नाही याचा सखोल विचार शासनाने करणे गरजेचे आहे अशी मागणी आता गडबवाडी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट