रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असणारी श्रीमंत अंजनवेल ग्रामपंचायत आज कंगाल,का ? काका कदम.

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

रत्नागिरी :-रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात एकेकाळी सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारे अंजनवेल ग्रामपंचायत नक्की आज कंगाल का झाली आहे ? याची संपूर्ण फार्दा फास करण्या करिता कोकणाचे नामांकित सामाजिक कार्यकर्ते काका कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण पाडाच वाचून सांगितले आणि कशी एकंदरित मोठी भ्रष्टाचार झाली याच्या विरोधात आवाज उठविले. तर राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून एकंदरींत भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढायी तीव्र करीत सोमवार दि.०२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता अंजनवेल ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात कोकणातली पत्रकार यांना निमंत्रित करुण पत्रकार परिषद आयोजित केले. यात रायगड,रत्नागिरी सह ईतर जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंजनवेल ग्रामपंचायत हि रत्नागिरी जिल्हा मधील गुहागर तालुका मधील एक सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते. येथे एक मोठी प्रकल्प अर्थातच एन्रॉन प्रकल्प असल्याने सदर ग्रामपंचायत ला मोठी कर प्राप्त मिळत असे.मात्र मागच्या ग्रामपंचायतीच्या या गलथान कारोभारमुळे आणि कैक कोटींची अफाट भ्रष्टाचार मुळे आजच्या घडीला याच अंजनवेल ग्रामपंचायतला साधी लाईट बिल भरण्यास पैसाच नसल्याची धक्कादायिक माहिती काका कदम यांनी पत्रकार परिषद मध्ये उपस्थित कोकणातली पत्रकार यांना निदर्शनास आणून दिले त्याचबरोबर सुमारे १०० पानांचे भ्रष्टाचार कशी झाली ? याचा झेरॉक्स कॉपी सेट (प्रती) अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाटले. कार्यक्रमाच्या पूर्वी ग्रामपचायत आवारातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेश काका कदम यानी पुष्पहार घालून अभिवादन केले तर सरपंच, उपसरपंच यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले, या नंतर दीप प्रज्वलन, तसेच राष्ट्र पिता माहात्मा गांधी, माजी प्रदानमंत्री लालबहादूर शास्त्री, छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण उपस्थित मान्यवर यांच्या हस्तेनी करण्यात आली. या नंतर काका कदम यांनी पत्रकार परिषदेत भ्रष्टाचार विरुद्धच्या मागील सत्तेदार जे दहा वर्ष सत्तेत राहून कशी अंजनवेल ग्रामपंचायत ची भ्रष्टाचार करुण कशी वाट लावली याची सुमारे दोन तास त्या वर अनेक उहा पोह केले.सध्या अंजनवेल ग्रामपंचायत ही ग्रामविकास पॅनल कडे सत्ता आहे आणि ही पॅनल १२ पेक्की एकूण नऊ जागा जिंकून सत्ते खेचून आणले जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेचे आहे. या वेळी व्यासं पीठावर काका कदम सह विद्यमान सरपंच सौ. सोनल आर. मोरे,उपसरंच श्री.बाळकृष्ण सुर्वे तसेच सर्व सत्ताधारी सदस्य उपस्थित होते तसेच सभाग्रहा मध्ये ग्रामस्थांनी गर्दी केली होती . दरम्यान काका कदम यांनी मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठीही मोठया प्रमाणात लढाई देत आहेत हा ही एक मोठी विशेष बाब आहे.


कोकणात येणाऱ्या मोठ मोठया प्रमाणात इंडस्ट्रिअल यां थांबाव्या यासाठी ही आमरण उपोषण काही दिवसात करणार हे ही सांगितले आहे कारण कोकण हा पर्यटन स्थळ असल्याने कोकणात आबे, नारळ, काजू, यांच्या वरती ही मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. कारण इंडस्ट्रिअल मुळे दूषित होणारे प्रदूषण केमिकल पाण्याचं प्रश्न असं भवतेक प्रमाणात नुकसानिला सामोरे जावं लागणार आहे. हे लवकरच थांबावं यासाठी उपोषण करनार अशी ग्वाही दिली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com