शेतकरी दिनानिमित्त शिवणीत सामाजिक कृतज्ञता सोहळा संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-शनिवार दिनांक २३ डिसेंबर२०२३ शेतकरी दिन त्या निमित्त रयत शिक्षण संस्थेचे,श्री म्हाळसाकांत विद्यालय शिवणी श्रीमती बाळकाबाई मारुती अधाटे शैक्षणिकै संकुल ता.कडेगांव जि.सांगली शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. विशाल माने साहेब पोलीस अधिकारी नवी मुंबई यांचे वतीने शिवणी गावातील विविध संस्थांना 5,55,555(पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये) सामाजिक बांधिलकी जोपासत देणगी दिली .

आपले व्यक्तिमत्त्व घडवताना ज्या ज्या व्यक्ती, संस्था,संघटनाचा सहभाग झाला त्याना आर्थिक मदत कण्याचा हा उपक्रम. त्या अंतर्गत शिवणीतील प्राथमिक शाळा,विध्यालय, सार्वजनिक वाचनालय, क्रिडा मंडळ,शेतकरी संघटना,सार्वजनिक मंदिरे.करियर अकॅडमी चा समावेश होता.सदरचा निधी डाॅ. विशाल माने यांच्या आई सौ.छाया माने व वडिल निवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख श्री.आनंदराव माने गुरुजी यांच्या हस्ते वितरित केला.

या कार्यक्रमाप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष *माजी खासदार श्री राजू शेट्टी साहेब तसेच माजी.प्रशासकीय अधिकारी ,प्रवचनकार, व्याख्याते श्री इंद्रजीत देशमुख साहेब उपस्थित होते.

याप्रसंगी शाळा विकासासाठी श्री विशाल माने यानी आपले १,०००००(एक लाख रुपये ) व *शेतकरी संघटनेसाठी रु१००००/-(एक लाख)
आदरणीय *श्री.राजू
शेट्टी साहेब* यांना देणगी दिली.
प्राथमिक शाळेचा निधी रू ५००००/- श्री.देशमुख सर व हायस्कूलचा निधी मुख्याध्यापक श्री. पि.टी.पवार सर व कचरे सर यानी स्विकारला.

शेतकरी दिनानिमित्त*शेतकरी संघटनेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते *मा.राजू शेट्टी व *संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बाबा माने विनायक पवार यानी पोलीस अधिकारी डाॅ.श्री.विशाल माने रू.एक लाख) व काही ग्रामस्थांच्या सहकार्यातून शेतकरी संघटनेचे कार्यालय सुरू केले त्याचे उद्घाटन मा.राजू शेट्टी यांच्या हस्ते पार पडले.

सदर कार्यक्रमानिमित्त शिवणीतील सर्व युवा शेतकरी,ग्रामपंचायत, सोसायटीचे सर्व सदस्य व ईतर क्षेत्रातील निवृत्त गावकरी,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंदर व नेटके सूत्रसंचालन संघटनेचे श्री.दत्ता महाराज चव्हाण यांनी केले.

प्रास्ताविकामध्ये डाॅ.विशाल माने
(पोलीस अधिकारी) यांनी
कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक बांधिलकीचे महत्त्व व पोलिस खात्यामार्फत त्यानी समाजातील गुन्हे कमी व्हावेत म्हणून सुरू केलेले अनेक उपक्रम व पुढील दिशा विषद कली या उपक्रमातून आत्तापर्यंत लाखो लोकांपर्यंत कसे पोहचलो हे सांगीतले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रवचनकार श्री.इंद्रजीत देशमुख)काका यानी वाढत्या मोबाईल वापराने उध्वस्त होणारी लहान पिढी,त्यामुळे उध्वस्त होणारे बालपण, मुलांमधील
वाढणारी गुन्हेगारी थांबवण्यासाठी व ज्यांना खरोखरच आपली मुले घडवायची आहेत त्या पालकांनी घरी आल्यानंतर सायंकाळी
६.०ते सकाळी ८.०पर्यंत मोबाईल बंद करून कपाटात ठेवणे व मुलं व कुटूंबासोबत पुर्ण वेळ घालवणे हे सुदृढ मण व सुदृढ कुटुंबांसाठी कशे आवश्यक आहे हे अनेक उदाहरणाने पटवून दिले.

प्रमुख पाहुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार मा.राजू शेट्टी साहेबानी संघटन शेतकरी कसे सामाजिक बांधिलकीतून जमा होणाऱ्या पैशातून चालवले जाते.आंदोलन चालू असताना यापूर्वी गोळीबारात बळी
पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शेतकऱ्यांनी प्रत्येकी२५लाखरु. मदत जमा करून दिले,अशा अनेक घटना त्यानी सविस्तर सांगुन सामाजिक बांधिलकीचे महत्त्व सांगीतले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष
श्री. राजेंद्र बाबा माने व कार्यकर्ते यानी म्हाळसाकांत विद्यालयच्या आवारात केले.

समारोप व आभार व्यक्त करताना भाई भार्गव पवार यानी दोन महान वक्त्यांनी व्यक्त केलेल्या विचाराचा थोडक्यात आढावा घेताना सुदृढ मणं व सुदृढ कुटुंबासाठी देशमुख काकानी सांगितल्याप्रमाणे मोबाईल घरात बंद ठेवून कुटुंबा सोबत वेळ घालवणे काळाची गरज आहे. तर राजू शेट्टी साहेब व विशाल माने यानी सामाजिक बांधिलकीचा आदर्श आपल्यासमोर ठेवला.त्याच प्रमाणे आपण सर्वांनीच आपण घडत असताना ज्यानी ज्यानी आपणाला मदत सहकार्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कली पाहिजे. ते करण्यासाठी आजच्या सारखे कृतज्ञतेचे सोहळे वारंवार व्हावेत हा आदर्श डाॅ.विशाल माने यानी ठेवला त्यांच्याबद्दल त्यांचे, तशेच उपस्थित पाहुणे व ईतरांचे तशेच संयोजक डाॅ.विशाल मानै व राजेंद्र बाबा माने यानी चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल विशेष आभार मानून कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट