शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावं म्हणून शेतीमाल रेल्वेद्वारे वाहतुक हा स्वस्त व जलद पर्याय – खा. राजेंद्र गावित

0
Spread the love

प्रतिनिधी- महेश वैद्य

पालघर :केळवे दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी विड्याची पान उत्तर भारतात व गुजरात मध्ये जाण्यासाठी जलद व स्वस्त पर्याय रेल्वेद्वारे होऊ शकतो ,म्हणून पालघर लोकसभेचे खासदार श्री राजेंद्र गावित साहेब यांनी पश्चिम रेल्वे मुंबई विभागाचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर श्री सत्यप्रकाश यांना घेऊन केळवा माहीम दौरा केला. केळवा शेतकरी सोसायटीमध्ये मीटिंगच्या वेळेस रेल्वे डिव्हिजनल मॅनेजर श्री सत्य कुमार यांनी शेतकऱ्यांच्या समोर विड्याची पान उत्तर भारतात नेण्यासाठी चार पर्याय सुचवले पोस्ट व रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने केळवा व माहीम येथील सोसायटी किंवा शेतकऱ्यांकडून विड्याची पाने उचलून ती पालघर व पालघर वरून सुरत व सुरत वरून दिल्ली येथे पाठवणे व दिल्लीतील मंडईपर्यंत पोहोचविणे


शेतकऱ्यांनी पालघर रणाकपूर या गाडीत पाने चढवून सुरतला उतरवून गोल्डन टेम्पल द्वारे दिल्ली व उत्तर भारतात पाठवणे
बांद्रा चंदीगड एक्सप्रेस आठवड्यातून दोन वेळा वांद्रे टर्मिनस वरनं सुटते तिचा थांबा पालघरला देऊन विड्याची पानं उत्तर भारतात पाठवणे व गोल्डन टेम्पल ह्या गाडीचा थांबा पालघरला देऊन डायरेक्ट पालघर ते दिल्ली अशी थेट पाने पाठवणे
या बैठकीसाठी डीआरएम सत्यकुमार यांच्यासोबत डीसीएम अरुण मीना, डीसीएम एफएम विश्वास गुप्ता, हे रेल्वे अधिकारी उपस्थित होते.


केळवा शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष श्री जयेश पाटील यांनी प्रास्ताविक केले .व शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या .
आपल्या मार्गदर्शन भाषणात खासदार राजेंद्र गावित म्हणाले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी प्रंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब प्रयत्न करीत आहेत. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विड्याची पानासोबत नारळ ,सुपारी ,कारली, दुधी ,सिमला मिरची, फळे चिकू याची वाहतुक रेल्वे द्वारे केल्यास वाहतुकीचा खर्च कमी होईल वेळ वाचेल वाहतुकीचा खर्च कमी झाल्यास उत्पन्नही वाढेल . रेल्वेच्या अनेक समस्या घोलवड ते नायगाव यादरम्यान आहेत ह्या समस्यांबाबत डिवीडनर रेल्वे मॅनेजर सत्यकुमार यांना खासदार राजेंद्र गावित साहेब यांनी निवेदन दिले, त्यात अनेक स्टेशनवर लिफ्ट, इंडिकेटर्स, डब्याच्या पोझिशन चे फलक, अनाउन्समेंट, स्वच्छतागृह , करुना मध्ये बंद झालेल्या रेल्वे ट्रेन सुरू करणे ,इत्यादीचा समावेश आहे .या विषयावरती ही साधक वादक चर्चा झाली. डी आर यु सी सी सदस्य केदार काळे या वेळेला उपस्थित होते त्यांनी अनेक समस्या दिविजनल रेल्वे मॅनेजर यांच्यासमोर मांडल्या व त्या सोडवण्याची मागणी केली त्यात सकाळी डहाणूहून सुटणारी 07 .05 ची विरार लोकल करोना मध्ये बंद झालेल्या गाड्या डहाणू हुन सुटणारी किसान ट्रेन ही पालघर पर्यंत वाढवणे, अशा अनेक मागण्या होत्या. ह्या वेळेस डी आर यु सदस्य हृदयनाथ म्हात्रे माहीम व केळव्यांमधील शेतकरी उपस्थित होते .त्यानंतर डीआरएम व खासदार राजेंद्र गावित यांनी प्रत्यक्ष विड्याच्या पानाची लागवड तोडणी बघण्यासाठी पानवेली च्या शेताची पाहणी केली .नवीन टाईम टेबल बनविताना सकाळची बंद झालेली ईएमयू गाडी सुरू करण्याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांनी सुतवाच केलं .तसेच कोविडमध्ये बंद झालेली अजमेर ची गाडी ही लवकर सुरू होणार आहे अशी चर्चाही झाली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट