सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झालेल्या ७ व्या राष्ट्रीय पोषण महा सांगता समारंभात मा.आदितीताई तटकरे यांचा सहभाग..

प्रतिनिधी-महेश देवाळे
मुंबई :- या पोषण माह उपक्रमात उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

सन २०१८ पासून सप्टेंबर महिना हा दरवर्षी पोषण माह म्हणून साजरा केला जातो. याद्वारे जनजागृती मोहीम राबवून बालकांच्या पोषणासाठी प्रयत्न केले जातात. या वर्षी सर्व जिल्ह्यांच्या एकत्रित प्रयत्नातून राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला.
या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व कुपोषणाच्या समूळ उच्चाटन कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधीक्षक श्री. कैलास पगारे, रायगड जिल्हाधिकारी श्री.किसन जावळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com