रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ )पालघर तालुका महिला आघाडी यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती महोत्सव व त्यानिमित्त महिलांचे स्नेहसंमेलन (हळदी-कुंकू )जागर स्त्री-शक्तीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

0
Spread the love

पालघर

  प्रतिनिधी -शरद जाधव 

दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी पालघर येथील ऑर्चिड हॉल येथे त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती महोत्सव रिपाई (आ) पालघर तालुका महिला आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच यावेळी महिलांचे स्नेहसंमेलन (हळदी-कुंकू ) व जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम पार पडला.*

माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती हा केवळ जन्मदिवस नसून महिला सशक्तिकरण शिक्षण आणि सामाजिक समतेच्या लढ्यातील एक प्रेरणादायी पर्व आहे.त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन म्हणजे त्याग,संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीच एक उत्तम उदाहरण आहे.समाजातील दलित,शोषित, पीडित विशेषत महिलांसाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. म्हणून आपण त्यांना त्यागमूर्ती म्हणतो.यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर या महामातांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा गौरव करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.आलेल्या मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.सुरेश जाधव (पालघर जिल्हा अध्यक्ष) हे होते. बाबासाहेबांनी समाज सुधारण्याचे जे महान कार्य हाती घेतले होते त्यामागे रमाबाईचं मोठं योगदान आहे माता रमाई या ध्येय आणि सहनशीलतेलने प्रत्येक अडचणीला सामोरे गेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षण घेत असताना रमाबाईंनी घराची जबाबदारी सांभाळली.अत्यंत कठीण परिस्थिती त्यांनी कधीच तक्रार केली नाही.त्यांचा समर्पण त्याग आणि संघर्षमय जीवन हे आजच्या महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे बाबासाहेब परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकले आणि भारतीय समाजात परिवर्तन घडू शकले.

स्त्री शक्ती म्हणजे काय?

माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन हा त्याग,समर्पण, सामाजिक न्यायासाठी जगणाऱ्या स्त्रीचा आदर्श आहे. त्यांचे कार्य आणि संघर्ष आजही महिलांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. आजच्या काळात त्यांच्या जीवनातून शिकून महिलांनी शिक्षण,स्वावलंबन आणि सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. असे यावेळी आपल्या भाषणात सुरेश जाधव साहेब बोलत होते.

जागर स्त्री शक्तीचा

 स्त्री सशक्तिकरण हा केवळ महिलांसाठी नाही तर संपूर्ण समाजाचा उज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे जिथे स्त्रीया सशक्त असतात तिथे समाज अधिक प्रगत आणि न्यायपूर्ण असतो तसेच आजकाल वाढलेले सोशल मीडिया आणि ईमेलद्वारे फिशिंग हल्ले होत आहेत यातून लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पासवर्ड आर्थिक माहिती आणि वैयक्तिक माहिती घेतली जात आहे हे हल्ले आयडेंटिटी चोरी आर्थिक नुकसान आणि खाते अनधिकृत प्रवेश याला कारणीभूत ठरू शकतात अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी पालघर पोलीस स्टेशन येथील आयु प्राजक्ता पाटील मॅडम (उपनिरीक्षक पालघर पोलीस ठाणे) यांनी स्त्रियांमध्ये जनजागृती केली.समाजसेवा आणि कर्तव्यनिष्ठता आपल्या जीवनात सामाजिक भान असणे गरजेचे आहे आज स्त्री ज्या उच्च पदावर जाऊन पोहोचलेली आहे हे फक्त आणि फक्त माता रमाबाई यांच्या त्यागामुळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झालं आहे. स्त्री हे केवळ व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे आजच्या काळात स्त्रीया आय.एस., आय. पी. एस., डॉक्टर, इंजिनीयर, वकील, उद्योजक, विविध टेक्नॉलॉजी, आमदार,खासदार, मंत्री, मुख्यमंत्री,पंतप्रधान ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे स्त्री ही समाजाची निर्मिती आहे.गेली अनेक वर्ष महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले शिक्षण,स्वातंत्र्य,निर्णय, क्षमता यांच्यासारख्या मूलभूत अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले परंतु माता रमाई यांच्या त्यागामुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला संविधानामुळे काळ बदलला आणि आज स्त्रीया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत यांचे सर्व आणि सर्व श्रेय फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला जातं असे प्रदिपादन यावेळी मा.डॉ. नम्रता निकोले (वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पालघर )यांनी केले.
    यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना हळदी कुंकू हा आपल्या पारंपारिक सणांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो हळदी कुंकू हा स्त्री सौभाग्याचा आणि मांगल्याचे प्रतीक आहे असे प्रतिपादन करून आपल्या भाषणात माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांचा त्याग आणि कार्य डोळ्यासमोर ठेवून स्त्री शक्तीचा जागर या विषयावर आपले अनमोल विचार व्यक्त केले.
 सदर कार्यक्रमात समस्त पालघर तालुक्यातील बहुजन महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली महिलांच स्नेहसंमेलन (हळदी-कुंकू) सोबत महिलांना पुष्प, गोडधोड वाटप ,अल्पोपहार, चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या सर्व महिलांना या कार्यक्रमानिमित्त गिफ्ट वाटप करण्यात आले.
 यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. सुरेश जाधव (पालघर जिल्हा अध्यक्ष रिपाई तथा निमंत्रित सदस्य जिल्हा नियोजन समिती पालघर) प्राजक्ता पाटील  (उपनिरीक्षक पालघर पोलीस ठाणे )डॉ.नम्रता निकोले ( वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पालघर )शमीम शेख (एकता सामाजिक संस्था) सरिता ठाकूर  (पालघर उपशहर संघटिका शिवसेना) निकिता कोंगिल (आशा वर्कर) भारती सावे (दक्षता समिती रेल्वे पालघर) रोहिणी गायकवाड (महिला  अध्यक्षा रिपाई आ. पा. जि )संध्याताई राऊत (महिला उपाध्यक्षा रिपाई आ. पा. जि.)सविता मल्हाह (पालघर शहर संघटिका शिवसेना)  शुभांगी मुजस (बालकल्याण समिती सदस्य )मधुमती लाडे (बालकल्याण समिती सदस्य) शारदा राम (महिला संघटक उ.बा. ठा.शिवसेना) शालिनी मेनन ( सामाजिक कार्यकर्त्या ) चंदा दुबे ( भाजपा कार्यकर्त्या  )  शुभांगी नातू राठोड (समाजसेविका) इतर मान्यवरांसहित मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
  सदर कार्यक्रमाचे आयोजन रिपाई आ.महिला आघाडीच्या वतीने वर्षा काटेला( अध्यक्षा अ.ज.सेल म. आ. पा.जि.)संजोग उपाध्याय ( संघटक म. आ.पा.जि.)विमल चौधरी (उपाध्यक्ष म.आ.पा.जि.)सुरेखा नम( ज्येष्ठ कार्यकर्ती ),हर्षला, धानवा (अध्यक्ष पा. ता.अ. ज. सेल म. आ.)धनश्री जाधव,सुमन दुबळा, सुरेखा गायकवाड, नंदा रजक,सुलताना खलिफा,सुप्रिया जाधव,अनिता पागधरे, कल्पना जाधव,श्रेया वरठा, राम ठाकूर (युवा उपाध्यक्ष पालघर तालुका) सचिन घाडीगावकर ( युवा संघटक पालघर तालुका) संजय पाटील ( शाखाध्यक्ष चहाडे) व अनेक महिला कार्यकर्त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. शरद जाधव (युवा अध्यक्ष पालघर तालुका )आयु.अंकिता जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट