महाड ते रायगड रस्त्याच्या समस्यांबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना परिसरातील नागरिकांचे निवेदन…

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड: कोकणवासीयांच्या हक्काचा मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची संथगती आता सर्वांनीच पाहिली आहे. जवळजवळ बारा वर्षे होऊनही हा महामार्ग अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही..
संपूर्ण कोकणवासीय यामुळे त्रस्त असतानाच..
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगडाला जोडणारा महाड शहरापासूनच्या नियोजित रस्त्याची घोषणा होऊन देखील सहा वर्ष होऊन उलटून गेली.. तरीही या परिसरातील नागरिक या रस्त्याच्या अर्धवट झालेल्या कामामुळे अत्यंत त्रस्त असून त्यानी आपल्या समस्यांचा पाढाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांजवळ वाचला.
अनेक ठिकाणी चढ-उतार अर्धवट रस्ता, मातीचे,धुळीचे साम्राज्य यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे देखील त्यांनी यावेळी त्यांच्या निदर्शनात आणून दिले. बांधकाम विभागाच्या संबंधित महामार्ग विभागाच्या महिला अधिकारी मेश्राम मॅडम यांनी त्यांच्या समस्या जाणून यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन उपस्थित सर्व नागरिकांना दिले.
यावेळी मावळा संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष संतोष जाधव
संघटक गजानन महाडिक
रोशन केंबडेकर
स्वप्निल पार्टी
निखिल पाटील
योगेश भागवत
अजित सुतार इत्यादी सदस्य व नागरिक
उपस्थित होते.