रत्नागिरीत मंडणगड तालुक्यातील अनेक धनगरवाड्या विकासापासून वंचित – गणेश बिल्लार

प्रतिनिधी- गणेश गायकवाड
मंडणगड: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात दुर्गम आणि विकासापासून कायम वंचित राहिलेला तालुका म्हणजे मंडणगड. याच मंडणगड तालुक्यात १२ हून अधिक धनगर वाड्या वसल्या असून मूलभूत विकासा पासून तसेच पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. देश स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली असली तरी तालुक्यातील अनेक धनगर वाड्या ह्या विकासाच्या चाहूलीची वाट बघत आहेत. अनेक धनगर बांधवाना शासनदरबारी संघर्ष करावा लागत असल्याची खंत महाराणी अहिल्यादेवी समाज प्रभोधन मंच मंडणगड चे तालुकाध्यक्ष गणेश बिल्लार यांनी व्यक्त केली आहे. केवळ निवडणुकांसाठी आश्वांनांची खैरात केली जाते परंतु विकास कामांच्या नावाने घोर फसवणूक केली जात असल्याने धनगर समाजाची केवळ मतांसाठी दिशाभूल केली जाते असे म्हटले.

मंडणगड तालुका लोकसंख्येने लहान असला तरी तालुक्यात अनेक धनगरवाड्या वसलेल्या आहेत. फारच कमी धनगरवाड्यावर रस्त्याची सुविधा पोहचली असून बहुतांश धनगरवाड्यावर रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा पोहचणे अद्याप बाकी आहे. परंतु सध्याची रस्त्याची परिस्थिती पाहता रस्त्याचे अवस्था अत्यंत खराब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्ता असूनही त्याचा उपयोग स्थानिक ग्रामस्थांना घेता येत नाही. कित्येक वाड्यांवर रस्ता पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आजारी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मोठी मशागत करावी लागत आहे. वेळेवर औषधउपचार न मिळाल्यामुळे धनगरवाड्यांवरील नागरिकांना मृत्यूशी संघर्ष करावा लागत आहे. धनगर बांधवांचे अजून किती दिवस हाल होणार असा सवाल धनगर समाज संघटनांकडून सरकारला विचारला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजाच्या विकासासाठी काम करणारी सामाजिक संघटना, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी धनगर समाजाच्या मूलभूत विकास कामांची निवेदने शासनदरबारी सादर करून प्रचंड पाठपुरावा करत आहे. परंतु प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे धनगरवाड्यांच्या विकास कामांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. धनगरवाड्यांच्या विकास कामांना अपेक्षित न्याय दिलेला नाही. यामुळे धनगर सामाजाकडून प्रचंड नाराजी प्रकट होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com