राज्यस्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक महिला कबड्डी स्पर्धेत राजापूरच्या रिया तावडे करणार मुंबई उपनगरचे नेतृत्व..

प्रतिनिधी-कीशोर लाड
मुंबई ;बारामती येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक महिला कबड्डी स्पर्धेत राजापूर तालुक्यातील वाल्ये गावची कुमारी रिया महेश तावडे ही मुंबई उपनगर पूर्व संघाचे नेतृत्व करणार आहे .आपल्या चिकाटी आणि जिद्दीने ईथपर्यंत पोहोचलेल्या कुमारी रिया हीचे समाजातील विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .