केंद्र सरकारच्या देशव्यापी बालविवाह मुक्त भारत मोहिमेचे पालघर मध्ये जनजागृती…

उपसंपादक- मंगेश उईके
पालघर:- पालघर जिल्हा प्रशासनाने बालविवाहविरोधात जनजागृती करण्यासाठी रॅली आणि शपथविधी समारंभाचे आयोजन केले होते.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जनजागृती वाहनास हिरवा झेंडा दाखवून केली जनजागृतीला जिल्ह्यात सुरवात
दि २८ नोव्हेंबर : विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी बालविवाह मुक्त भारत मोहिमेचा प्रारंभ केला.


याला प्रतिसाद म्हणून पालघर जिल्ह्यातील प्रशासनाने सामाजिक संस्था सोशल एम्पॉवरमेंट अँड वॉलेंटरी असोसिएशन (SEVA) आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट (MSVT) यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
MSVT व SEVAया संस्था Just Right for Children या देशभरातील ४०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या २२५ पेक्षा जास्त बालसंरक्षण एनजीओच्या राष्ट्रीय नेटवर्कचा भाग आहेत. या मोहिमेमुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जनजागृतीस चालना मिळाली आहे.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि जिल्हा बालविकास अधिकारी विनोद राठोड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी ग्रामस्थ, ग्रामप्रमुख, बालसंरक्षण अधिकारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आणि कर्मचारी उपस्थित राहून शपथविधीत सहभागी झाले.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके म्हणाले
“केंद्र सरकारचे हे पाऊल पालघर जिल्ह्याला बालविवाहमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे आहे. नागरिकांनी MSVT व SEVA संस्थांच्या सहकार्याने या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा. शासन बालविवाहमुक्त जिल्हा करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
MSVT अध्यक्ष मनोज गावंड यांचे म्हणाले
“बालविवाह रोखण्यासाठी आम्ही सरकारी अधिकारी व स्थानिक प्रमुखांच्या सहकार्याने काम करत आहोत. या मोहिमेमुळे आमच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा व पाठबळ मिळेल.”
SEVA अध्यक्ष ॲड. अशोक पवार म्हणाले
बालविवाह हा गुन्हा असून देश याविरुद्ध शांत बसणार नाही. प्रत्येक मुलाला हक्काचे बालपण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बालविवाहमुक्त भारत ही मोहीम या प्रयत्नांचा एक भाग आहे.”
प्रोग्राम मॅनेजर रामेश्वर भाले, ॲड . संजीवनी जाधव प्रकल्प समन्वयक पालघर ,वैभव गायकवाड, निकिता ताम्हणकर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या मोहिमेचा उद्देश सर्व बालकांना बालविवाहाच्या विळख्यातून मुक्त करणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे. पालघर जिल्हा प्रशासनाने या उद्दिष्टासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com