प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे वितरण आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :- पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातील एकही घटक निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही
-पालकमंत्री गणेश नाईक

पालघर दि.22: मानवी जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहेत. या गरजांचा एक महत्त्वाचा भाग निवारा आहे. निवारा मिळणे हा प्रत्येकाचा नैसर्गिक हक्क असून पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातील एकही घटक निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत राज विभागाच्या सर्वांसाठी घरे” या धोरणांतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२” अंतर्गत आज, दि. २२ फेब्रुवारी, २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री, अमित शहा व मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते राज्यातील २० लाख लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण, १० लाख लाभार्थ्यांना एका क्लिकमध्ये पहिला हप्ता पुणे येथे वितरीत करण्यात आला.‌
त्यानुषंगाने पालघर जिल्हयात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थींना तालुकानिहाय मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार आज

जननायक बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद पालघर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरावर प्रातिनिधीक स्वरूपात
लाभार्थ्यांना मंजुरी पत्र . त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपायुक्त (विकास) कोकण विभाग प्रदिप घोरपडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पालघर जिल्हयात सन 2024-25 या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ च्या अंतर्गत एकूण 59 हजार 535 मंजूरीपत्र व 24 हजार 890 प्रथम हप्ताचे वितरण करण्यात आले आहे.
पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की,पालघर जिल्हयाने विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जोपर्यंत आदिवासी समाजाला शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. त्यासाठी आदिवासी बांधवांनी प्रथम शिक्षण घेतले पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
श्री.नाईक पुढे म्हणाले की, पालघर जिल्हयात वाढवण बंदर होत आहे. या बंदरामुळे जिल्हयातील आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबणार असून त्यांना या ठिकाणी मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असून. या योजनेपासून पालघर जिल्हयातील एकही घटक घरापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट