पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू..

उपसंपादक : राकेश देशमुख
महाड :-राज्यात उद्या आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री १ च्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. डोंबिवली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची ट्रॅव्हलबस ट्रॅक्टरला जोरदार धडकली असून या भीषण अपघात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहेत.
या ट्रॅव्हल्स वरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रॅव्हल्स ही ट्रॅक्टरला जाऊन धडकली. व रस्त्याखाली थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात ५ जण ठार झाले तर २० ते २५ जण जखमी झले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचावकार्य राबावत जखमी नागरिकांना जवळील एमजीएम रूग्णालय तसेच पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com