५० हजारची लाच मागणाऱ्या पालघर उपजिल्हाधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक…

0
Spread the love

उपसंपादक- मंगेश उईके

पालघर :-पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी आज अटक केली.

पालघरमधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झाली होती. मात्र एक वर्ष वाढवून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते.

वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असलेले तक्रारदार आपली फाईल घेऊन गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही फाईल क्लिअर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदारांकडे ५० हजारांची लाच मागितली असता मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट