पालघर पोलीस ठाण्यातर्फे विभागात सोशल मीडियावर २ धर्मात तेढ निर्माण होण्याच्या दृष्टीने आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करण्याचा गंभीर इशारा….

उपसंपादक-रणजित मस्के
पालघर:
सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, सध्या काही दिवसांपासुन सोशल मिडीयावर जाणीवपुर्वक काही असामाजिक घटक समाजात तेढ निर्माण होण्याचे दृष्टीने दोन गटात, धर्मात तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने आक्षेपार्ह रिल्स, पोस्ट, व्हीडीओ, स्टेटस बनवून ते सोशल मिडीयावर व्हायरल करून सामाजीक सलोखा व शांततेतचा भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्यातुनच समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून सार्वजनीक शांतता भंग करीत आहेत.
तरी कळत अथवा नकळत आपल्याकडून असे रिल्स, पोस्ट, व्हीडीओ, स्टेटस सोशल मिडीया साईटवर फेसबूक, ईंस्टाग्राम, व्हाट्सअपग्रूप यामध्ये प्रसारीत केले जात असतात परंतु असे करताना सदरच्या व्हीडीओमुळे, संदेशामुळे कोणत्याही धर्माच्या / गटाच्या भावना दुखावल्या जावून समाजात दंगली सारखे प्रकार घडतात तरी आपण समाजाचे सुशिक्षीत व सुजाण नागरीक म्हणून प्रत्येकाने सोशल मिडीया हाताळताना आपणाकडून असा प्रकार होवू नये याची खबरदारी घेणे हि आपली प्रत्येकाची सामाजीक जबाबदारी आहे.

भारत हे सार्वभौम राष्ट्र असुन येथे प्रत्येक जाती धर्मीयांना समाजात समान स्थान आहे. तरी कोणीही जाणीवपुर्वक दोन गटात, धर्मात, समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने आक्षेपार्ह रिल्स, पोस्ट, व्हीडीओ, स्टेटस बनवून ते सोशल मिडीयावर व्हायरल करून सार्वजनीक शांतता भंग करीत असेल तसेच असे करणाऱ्या व्यक्तींच्या पोस्ट शेअर, लाईक, सबस्क्राईब करणाऱ्या सर्व संबधीतांवर पोलीसांकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.असा गंभीर इशारा श्री.
दत्तात्रय किंद्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालघर पोलीस ठाणे यांनी दिला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com