पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कडून सायबर गुन्हे मुक्त पालघर जिल्हा मोहीम…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात. काही नागरीक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थीक दहशदवाद आहे. पालघर जिल्हयातील नागरीक सायबर गुन्हंयाना बळी पड्डु नये तसेच त्यांचेमध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे संकल्पनेतुन जनसंवाद अभियानांतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “सायबर गुन्हे मुक्त गाव” ही मोहिम राबविण्यात येत आहे. “सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम” अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमलदार हे आपल्या गावात येवुन सायबर गुन्हे जनजागृतीसाठी सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे व वाईट चालीरीती बाबत तयारकरण्यात आलेली चित्रफित दाखविणार आहेत. आपणास या सर्व विषयाबाबत काही प्रश्न असल्यास त्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हयातील सर्व नागरीकांना सायबर व आर्थिक गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच आपले नातेवाईक, मित्र परिवार यांचेमध्येही जनजागृती करावी. पालघर जिल्हा सायबर साक्षर करण्यासाठी सायबर क्राईम मुक्त जिल्हा या मोहीमेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी केले आहे.