नाते खिंड रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेशमा माने

महाड:– दराडीचा धोका असलेल्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष…!
३५ परिवाराचा जीव टांगणीला..

महाड शहरानजीक असलेल्या नतेखिंड परिसरातील हॉटेल रायगड ढाबा वर दरड कोसळून त्याचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे हाकेच्या अंतरावर असलेल्या शिव वंदना इमारतीमधील रहिवाश्यांचा जीव टांगणीला लागला आहे. रविवारी येथील खिंड (डोंगर) फोडण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून करण्यात आला आणि स्थानिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याचे दिसून आले.

नाते खिंड परिसरात गेल्या १३ वर्षापासून उभ्या असलेल्या शिव वंदना सहकारी संस्थेत ३५ परिवार आजपर्यंत आनंदाने राहत आहेत, पण मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू झाले आणि इमारतीला हादरे बसू लागले, त्यामुळे अनेक घरे आणि गाळ्यामध्ये तडे गेले. याबाबत येथील रहिवाश्यांनी संबंधित विभागाकडे तक्रार व पत्रव्यवहारही केला आहे. पण त्याचा काहीच फायदा झालेला नाही.

एका बाजूने दरड कोसळण्याची टांगती तलवार असतना काही दिवसात तयार होणारा महाड-रायगड रस्ता हा देखील या इमारतीच्या अगदी जवळून जानारा आहे. त्यामुळे सदर इमारतीला मोठा धोका होणार आहे. या कामामुळे आमची ईमारत पडेल की काय अशी भीती रहिवाशी व्यक्त करत होते.
सध्या चिंतेच्या वातावरणात जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या शिव वंदना सोसायटी मधील रहिवाश्यांना रविवार (२ जुलै) ची सकाळ अधिकच काळजीत टाकणारी उजाडली. कारण याठिकाणी असलेला डोंगर (खिंड) फोडण्यासाठी महाड रायगड रस्त्याचे काम पाहणाऱ्या संबंधित विभागाने आपली माणसं आणि यंत्रे पाचारण केली होती.

याची माहिती मिळताच शिव वंदना सहकारी संस्थेतील महिला, पुरुष तसेच शेजारील लोक मोठ्या संख्येने जमले आणि या कामाला जोरदार विरोध केला. आधीच मुंबई गोवा महामार्गच्या कामामुळे आमच्या ईमारतिचे अतोनात नुकसान झाले आहे आणि महाड रायगड रस्ता रुंदीकरणमुळे उरली सुरली इमारत देखील जमीनदोस्त होईल अशी भीती व्यक्त करत रहिवाश्यांनी आपला जोरदार विरोध व्यक्त केला.
नाते खिंडीत रायगड ढाबा जवळ दरड कोसळण्याची ही घटना घडली त्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या शिव वंदना सहकारी संस्थेला देखील भविष्यात या दरडीचा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी ऑडिट करावे अशी मागणी होत असल्याचे वृत्तपत्रांनी म्हटले होते, पण सदरची दरड कोसळली त्याला आता १० ते १५ दिवस उलटले आहेत, मात्र आता पर्यंत प्रशासनाकडून एकाही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने अजून शिव वंदना सोसायटी किंव्हा आजूबाजूच्या परिसराला भेट दिलेली नाही किंव्हा त्याची पाहणी देखील केलेली नाही. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या ३५ कुटुंबाना आता घोर लागला आहे. भविष्यात अपघात होऊन ईमारत ढिगाऱ्याखाली गेल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का? अशी शंका आता येथील रहिवाश्यांना येत आहे. जो पर्यंत शासन योग्य निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी काम होऊ देणार नाही. असा पवित्रा आता येथील रहिवाशांनी घेतला आहे.

जागा मालक एखाद्या विकासकाला हताशी धरून आपल्या जागेत एखादी ईमारत ऊभी करतो आणि त्याचा मोबदलाही घेतो, मात्र बऱ्याचदा त्यांच्यातील झालेल्या करारानुसार आणि शासन निर्णयानुसार सदरची ईमारत रजिस्टर करण्यास व कराराची जागा सोसायटीच्या नावे करण्यास टाळाटाळ होते. शिव वंदना सोसायटी च्या बाबतीतही असेच झाले, पण जागृत सभासदांनी डीम कन्व्हेयन्स करत मोठ्या जिकरीने सदरची जागा आपल्या नावे केली आहे.

भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्घटना किंव्हा मनुष्य हानी झाल्यास आमच्या घराची राख रांगोळी होईल आणि आमचीही स्थिती मालीन गाव किंवा महाड मधील तारीख गार्डन इमारती सारखीच होईल. अशी भीती आता येथील रहिवाश्यांनी वाटत आहे. त्यामुळे शासनाने आमची ईमारत व जागा महाड रायगड रस्त्यांतर्गत संपादित करावी, अशी मागणी सोसायटी मधील नागरिकांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट