नंदुरबार पोलीसांनी केले अपघातग्रस्तांच्या दुःखाचे सीमोल्लंघन !

प्रतिनिधी-रणजित मस्के
नंदुरबार: मागील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एका खाजगी बसने ऊसतोडणी मजूर घेऊन सांगलीकडे जाणाऱ्या आयशरला समोरुन धडक दिल्याने या अपघातात ४ महिला व २ पुरुष असे ६ मजूर जागीच ठार झाले तर १५ मजूर गंभीर जखमी झाले.
पोलीसांनी बसचालकाला तात्काळ अटकसुद्धा केली. गोष्ट इथे संपत नाही. ऊसतोडणीचा सिझन सुरु झाला की दसऱ्याचे तोंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी ऊसतोडणी मजूर बाया माणसे मुले ट्रकने साखर कारखान्यांच्या पट्ट्यात स्थलांतरीत होतात.
चार पाच महिने गुरासारखे ऊसतोडणीसाठी राबायचे.दसरा,दिवाळी,मकर संक्रांत हे सण ऊसाच्या शेतातच साजरे करायचे आणि मिळालेली मजुरी घेऊन गुढी पाडव्याला गावाला परतायचे.पुढचे वर्षभर पुढच्या सिझनची वाट बघत त्या मजुरीवर गुजराण करायची. अंगावर अंगभर कपडे नाहीत,पायात चप्पल नाही, शिक्षणाची तर लांबची गोष्ट.
या भीषण अपघातात कर्ते पुरुष आणि महिला गमावलेल्या पाडळदा आणि अलखेडा या गावावर शोककळा पसरली. अशात नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह गावात येतात.थेट झोपडीसमोर बसकन मांडून बसतात आणि त्यांच्या दुखात सामिल होतात.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com