पालघर होऊन मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सुरू झाल्याने प्रवासी आनंदी..

0
Spread the love

प्रतिनिधी. मंगेश उईके

पालघर:- पालघरला मंगळवारी दि.२८/०५/२०२४ रोजी सायंकाळी सुमारे ५.००. वाजता पालघरच्या रेल्वे रुळावरून मालगाडी घसरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अप मार्गीकेवरील रेल्वे सेवा खंडित राहिली होती.

सुमारे २६ ते २७ तास रात्र दिवस दुरुस्तीचे काम पूर्ण करून सायंकाळी ७.३० वाजता च्या सुमारास डहाणू रोड कडून विरारकडे पहिली लोकल गाडी पालघर येथून प्लॅटफॉर्म क्र. ०२ वरून सोडण्यात आली.

विभागीय रेल्वे अधिकारी (डीआरएम) नीरज वर्मा यांनी काल रात्रीपर्यंत बसून दुरुस्तीच्या कामावर स्वतः देखरेख ठेवली. यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, व तसेच ५०० पेक्षा अधिक कामगाराने घसरलेल्या डबे सरकविणे, विद्युत वाहिनी पूर्वत करणे, नव्याने रुळांची अंथरणी करणे व आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर रेल्वे सेवा सुरू केल्याने प्रवाशांनी आनंदाचा श्वास घेतला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट