शेतकरी बांधवांचा देश म्हणून भारताची ओळख – महाड तहसीलदार श्री महेश शितोळे

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड:– शेतात शेतकरी दिवसभर राबतो त्यामुळे अन्नाची प्राप्ती – महाड तहसीलदार महेश शितोळे

कृषी महाविद्यालय, आचळोली आणि कृषी विभाग महाड च्या पुढाकाराने 1 जुलै – कृषी दिन उत्साहात संपन्न | कृषी दिंडी – जाणीव जागृती पर पथनाट्य आणि वृक्षारोपण अभियान चे आयोजन

महाड : शेती हा महाराष्टातील एक प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील अधिकतर लोक शेती हाच व्यवसाय करतात. महाराष्ट्रच नव्हे तर आपल्या पुर्ण देशाचीच अर्थव्यवस्था आज शेतीवर अवलंबुन आहे. शेतकरी शेतात दिवसभर राबतो त्यामुळे अन्नाची प्राप्ती होत आहे म्हणुन आपला भारत देश हा एक कृषीप्रधान म्हणजेच शेतकरी बांधवांचा देश म्हणुन ओळखला जातो. असे प्रतिपादन महाड चे विद्यमान तहसीलदार मा. श्री. महेश बाळासाहेब शितोळे यांनी कृषी दिन कार्यक्रमाचे उदघाट्न प्रसंगी केले. कृषी – कृषीजैव – अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, आचळोली, महाड आणि कृषी विभाग, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृषी दिन’ कार्यक्रमात श्री महेश शितोळे पुढे बोलतांना म्हणाले कि, 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन दरवर्षी साजरा केला जातो.

राज्यातील हरीत क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कृषी दिन निमित्ताने श्री. विरेश्वर देवस्थान येथून प्रारंभ झालेली कृषी दिंडी निसर्ग संवर्धनाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाने मार्गस्थ होऊन स्टेट बँक मार्गे बस स्थानक चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, चवदार तळे पर्यंत नियोजनबद्धरित्या काढण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. याप्रसंगी महाड तालुका कृषी अधिकारी श्री भरत कदम, एसबीएनएम कॅम्पस चे वरिष्ठ श्री जे. आर. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री यु. पी. कोकाटे, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय प्राचार्य डॉ.एच. आर.आगरे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय प्राचार्य कु. ए. एम. शेख, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी प्रा. माया देसाई आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री व्ही. जी. चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 1 ते 7 जुलै दरम्यान महाड मध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी शेतकरी बांधवांना वृक्ष भेट देऊन गौरव करण्यात आला. एनएसएस अधिकारी (राष्ट्रीय सेवा योजना), कृषि महाविद्यालय- प्रा. संदिप संकपाळ, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय- प्रा. संचिता पवार व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय- प्रा. स्नेहल भिसे व कृषि दर्पणचे संपादक मा. श्री. राजेंद्र जैतपाळ यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. सूत्रसंचालन- प्रा. दीप्ती भुवड व आभार प्रदर्शन- डॉ. स्वप्निल होळकर यांनी केले. एसबीएनएम कृषी कॅम्पस चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महाड शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती राजेंद्र जैतपाळ – प्रसिद्धी प्रमुख कृषी महाविद्यालय, आचळोली, महाड यानी दिली .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट