महाड भोर मार्गावरील सावित्री पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष…!

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड : महाड भोर मार्गावर महाड जवळील भोराव गावालगत असलेल्या सावित्री नदीवरील पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.


महापुरात वाहून आलेला कचरा, लाकडे पुलाच्या खालील बाजूला अडकून पडली असून भविष्यात या लाकडांमुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.
महाड भोर मार्गावर भोराव जवळ सावित्री नदीवर जुना पूल आहे. महाड भोर पुणे रस्त्याच्या निर्मितीसाठी सन १९५० साली बांधण्यात आलेला आहे.
महामार्गावर असलेल्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर या पुलाची देखील तपासणी झाली होती. यावर्षी ऐन पावसाळ्यात आलेल्या महापुरात या पुलावरून देखील पुराचे पाणी गेले. पोलादपूर भागातून मोठ्या प्रमाणावर चिखल कचरा आणि लाकडे मोठ्या प्रमाणावर वाहून आला.
हा कचरा या पुलाच्या खालील बाजूला असलेल्या लोखंडी रेलींगला अडकून पडले आहेत. यामध्ये अडकलेली अनेक लाकडे स्थानिक ग्रामस्थांनी काढून जळणासाठी घेवून गेले. मात्र अद्याप देखील कचरा, लाकडे यामध्ये अडकून पडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लक्ष देत नसल्याने भविष्यात पुन्हा असे पाणी आले तर अडकलेल्या लाकडांमुळे धोका निर्माण झाला आहे.
या पुलाच्या वरील बाजूस देखील उगवलेले गवत काढून टाकण्यात आले नाही. हि स्थिती आजदेखील तशीच आहे. यामुळे वाहनांना ये जा करताना अडथला निर्माण होत आहे.
पुलाच्या खालील बाजूला अडकलेली लाकडे आणि वरील बाजूस उगवलेले गवत यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे दादली आणि इतर पुलाकरिता कोट्यावधी रुपये खर्च होत असताना मुख्य मार्गावरील या पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जाते याबाबत प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com