मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर..!

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर :


मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचा १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रम हा संपुष महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीर ठाणेच्या कार्यक्षेत्रात सदर ७ कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या १०० दिवसाच्या ७ कलर्म कार्यक्रमामध्ये १. वेबसाईट, २. सुकर जीवनमान, ३. स्वच्छता, ४. तक्रार निवारण, ५. कार्यालयीन सोई सुविधा, ६. आर्थिक व औद्यागिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, ७. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी इत्यादी विषय आहेत.
पालघर जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करताना वेबसाईट अद्ययावत करून User Friendly बनवली, नागरिकांसाठी Chat Box सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम, Al based Chat Bot, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस कार्यप्रणाली, Visitor Management System, कार्यालयीन कामकाजामध्ये Al चा वापर, पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय अॅप्लीकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.
या ७ कलमी कार्यक्रमाअंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेकडून १०० दिवसांचे मुल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये पालघर पोलीस दलास १०० गुणांपैकी ९०.२९ गुण प्राप्त झाले आहेत. त्यामुळे १०० दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनानंतर पोलीस विभागातून महाराष्टातील एकूण ३४ जिल्हा पोलीस दलामधून पालघर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या अगोदर देखील ५० दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता.
सदरचा ७ कलमी कार्यक्रम हा मा. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, मा. श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्ष