अपहरण व खुनाचे गंभीर गुन्हयात ५ महिन्यापासून फरारी असलेला आरोपी मनोज राजपूत पालघर पोलीसांच्या जाळ्यात

उपसंपादक -मंगेश उईके
पालघर

घोलवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ११/२०२५ बीएनएस कलम १४० (३), १४० (१), १४२, ३५१ (२), ३ (५), ६१ (२) (अ), १०३ (१), २३८ (अ) प्रमाणे दि. २७/०१/२०२५ रोजी दाखल आहे.
सदर गुन्ह्यात दि.१९/०१/२०२५ रोजी मयत अशोक रमण धोडी, वय ५२ वर्षे, रा.वेवजी ता. तलासरी जि. पालघर याचा व त्याचा भाऊ अविनाश रमण थोडी यांचेत जमीनीचे व घरपट्टीचे कारणावरुन वाद होता. गुन्हयातील मुख्य आरोपी अविनाश रमण धोडी याने त्याचे साथीदारांसह कट रचून, मयत अशोक रमण थोडी याचे अपहरण करुन, त्यास जिवे ठार मारुन, त्याचा मृतदेह कारसह सरीगांम, ता. उमरगांव, जि. वलसाड, गुजरात राज्य येथील पाण्याने भरलेल्या खदानीत टाकून दिले होते.
सदर गुन्हयात मुख्य आरोपीसह एकुण ६ आरोपी अटक करण्यात आले असुन, उर्वरीत ०३ आरोपी फरार होते. दि.१२/०६/२०२५ रोजी फरार आरोपी मनोज भवरसिंग राजपुत, वय ३४ वर्षे, मुळ रा. काकलवास ता. देसुरी, जि. पाली, राजस्थान राज्य यास शहापुर, ता. शहापुर जि. ठाणे येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली असून, त्यास मा. प्रथमवर्ग न्यायालय, डहाणू येथे हजर करण्यात येणार आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती अंकिता कणसे, उप विभागीय पोलीस अधिकारी, डहाणू हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, डहाणू विभाग, श्रीमती अंकिता कणसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोउनि / रविंद्र वानखेडे, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहव/राकेश पाटील, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा/भगवान आव्हाड, पोअमं/महेश अवतार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पार पाडलेली आहे.