लोकप्रतिनिधींना इतिवृत्त घरपोच द्यावे -पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:- दि. 18 : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या विकास होत असताना वेळोवेळी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त जिल्हा नियोजन समितीच्या पदसिध्द सदस्य व अन्य सदस्यांना घरपोच द्यावे. असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अधिकारी वर्गांना दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

जे विकास कामे पूर्ण झाले आहेत त्याबाबतची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना द्या किंवा जे काम अपूर्ण आहे विलंब होत आहे त्याची कारणे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करावी व विकास कामे गतिशीलतेने पूर्ण करा.

विकासकामांच्या कार्याचा अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधी यांना सादर करणे आवश्यक असून असे अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना सादर करावे त्यानंतर बैठकीचे
आयोजन करावे सर्व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा सहमतीने आजची बैठक स्थगित करून 27 जुलै रोजी आयोजित करावी. असे निर्देश पालकमंत्री श्री चव्हाण यांनी दिले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट