सामाजिक न्याय भवन (डॉ.आंबेडकर भवन )संदर्भात रिपाई आ. चा प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-दि.३०/०९/२०२४ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र शासन पालकमंत्री पालघर यांचा जनता दरबार आयोजित केला होता. डॉ. आंबेडकर भवन (सामाजिक न्याय भवन) याकरिता मंजूर केलेल्या ५ एकर जागेचा ताबा सुकाणू व नियंत्रण समितीने तात्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पालघर यांना द्यावा व संबंधित विषयावर ताबडतोब आदेश पारित व्हावेत याकरिता जनता दरबारात हा विषय निकाली काढण्याकरता रवींद्र चव्हाण साहेब (पालकमंत्री) पालघर जिल्हा यांची भेट घेत जनता दरबारात ह्या विषयी विचारपूस रिपाई आ. च्या वतीने करण्यात आली.

संबंधित विषयाचा पाठपुरावा आजपर्यंत वेळोवेळी रिपाई आ. च्या वतीने केला असून त्या पाठोपाठ दलित पँथर व इतर सामाजिक संघटना यांनी सुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार, पाठपुरावा केला आहे.
परंतू सदर जागेचा ताबा आजता गायत समाजकल्याण विभागाला दिला गेलेला नाही. त्यामुळे पालघर येथील जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे असे यावेळी पालकमंत्री यांच्या लक्षात सुरेश जाधव (जिल्हाध्यक्ष पालघर रिपाई आ.) यांनी आणून दिले.आम्ही महायुती सोबत असून या प्रश्नाविषयी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब( केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री- भारत सरकार ) यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी फोन करून व पत्रद्वारे आदेश देत असताना किंवा इतर मंत्री गण याबाबत सकारात्मक असताना आपले अधिकारी त्यांच्या आदेशास जुमानत नसतील तर आम्हाला रिपाईआ.पालघर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करावा लागेल असे यावेळी सुरेश जाधव यांनी सांगितले असता पालकमंत्री यांनी आश्वासित केले कि मी सिडको च्या प्रमुख अधिकाऱ्यांशी तात्काळ बोलून स्वतः त्यात लक्ष घालून ती जागा संबंधित विभागाला सुपूर्द करण्याचे आश्वासन आपणास देत आहे .
यावेळी सुरेश जाधव (पालघर जिल्हाध्यक्ष ) सोमनाथ धनगावकर (पालघर जिल्हा सचिव ) वर्षा ताई काटेला (अनुसूचित जमाती सेल महिला अध्यक्षा पालघर जिल्हा)शरद जाधव (युवा अध्यक्ष पालघर तालुका) राम ठाकूर (युवा उपाध्यक्ष पालघर तालुका ) सचिन घाडीगावकर( युवा संघटक पालघर तालुका ) दीपेश गायकवाड युवा कार्यकर्ता पालघर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.*
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com