महामार्गाच्या मधोमध असलेला अनधिकृत दर्गा
न हटविल्यास तेथे गणपती मंदिर बांधणार…?
प्रतिनिधी-रेश्मा माने
मनसेचे महाड प्रांताधिकार्यांना निवेदन
महाडः– मुंबई -गोवा महामार्गावर वहूर या गावानजिक रस्त्यांच्या मधोमध असलेला अनधिकृत दर्गा पंधरा दिवसांत हटवावा, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाड प्रांताधिकार्यांना दिले आहे. पंधरा दिवसांत हा दर्गा न हटविल्यास, त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.


मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी या महामार्गालगत असणारी सर्व बांधकामे हटविण्यात आली आहेत. या कामात अडथळा निर्माण करणारी हिदूं मंदिरे हिंदू समाजाने स्वतःहून हटविली आहेत. वहूर येथील हा दर्गा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. हा दर्गा हटविण्यात न आल्याने तो आजही रस्त्याच्या मध्येच आहे.

रस्त्याच्या मधोमध असलेला हा अनधिकृत दर्गा तातडीने हटविण्यात यावा, पंधरा दिवसात ही कारवाई न झाल्यास या दर्ग्याच्या शेजारीच मंदिर बांध्ाून तेथे गणपतीची स्थापना करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष चेतन उतेकर यांनी आज महाडच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांना हे निवेदन दिले. यावेळेस मनसेचे शहर प्रमुख दीपक चव्हाण, मनसे मथाडी कामगार सेनेचे संजय गायकवाड, सुबोध जाधव, मंगल गोसावी, प्रगती गुहागरकर, उमा बंंडागळे, अभिजित पोटे, स्वप्नील वडके, सिध्दांत सुतार, लक्ष्मण कंक, प्रथमेश सुतार आदि मनसैनिक उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील माहिम समुद्रांत अनधिकृतरित्या बांधण्यात येत असलेल्या दर्ग्याविरोधात आवाज उठविल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तातडीने त्या ठिकाणचा दर्गा हटविला होता. आता मुंबई -गोवा महामार्गाच्या मधोमध असलेल्या वहूर येथील या दर्ग्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते याकडे सवार्ंचेच लक्ष लागले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com