हरवलेली सोन्याची अंगठी २४ तासाचे आत शोधुन काढली, मिरज शहर पोलीसांची कामगीरी..

सह संपादक- रणजित मस्के
मिरज ;घटनेची थोडक्यात हकीकत :-दिनांक ०८/०३/२०२५ रोजी इसम नामे राहुल पंडीत गायकवाड राहनार तासगाव चिंचनी हे सायंकाळच्या वेळी जेवण करण्याकरीता त्यांचे मित्रांसह रेहमतुल्ल्हा हॉटेल येथे आले असताना त्यांचे हातातील ०१ तोळा वजनाची किंमत ९९,५००/- रुपये किंमतीची अंगठी कुठेतरी पडुन हरवली होती. सर्वत्र शोध घेवुनही त्यांनी त्यांची अंगठी मिळुन आली नाही म्हणुन त्यांनी दिनांक ०९/०३/२०२५ रोजी मिरज शहर पोलीस ठाणेस येवुन सदर बाबत तक्रार दिली, मिरज शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी त्यांचे तक्रारीची तात्काळ दखल घेत मिरज शहर पोलीस ठाणेचे पो.शि. स्वप्नील नायकोडे, सुरेश वाघमारे, अमित मोरे, लक्ष्मण कौजलगी, श्रीकांत केंगार असे पथक सुचना देवुन सदर अंगठीचा शोध घेण्याकरीता रवाना केले. सदर पथकाने तात्काळ रहमतुल्ल्हा हॉटेल येथे जावुन तेथील सर्व सीसीटीव्ही तपासुन त्याआधारे सर्च ऑपरेशन राबवले असता नमुद हरवलेली अंगठी ही हॉटेलमधील डस्टबीन मध्ये पोलीसांना मिळुन आली.सदरची अंगठी ही तक्रारदार यांचीच असल्याची खात्री करुन पोलीसांनी सदर अंगठी तक्रारदार राहुल पंडीत गायकवाड यांना परत केली. यावेळी तक्रारदार राहुल पंडीत गायकवाड यांनी पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच त्यांची अंगठी त्यांना परत मिळाली असे मत व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले.सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे मार्गदर्शनाखाली पो. शि. स्वप्नील नायकोडे, सुरेश वाघमारे, अमित मोरे, लक्ष्मण कौजलगी, श्रीकांत केंगार यांनी केले आहे.