कशेळीत युवा ग्रुप वाडीवठार तर्फे जि.प. प्रा. शाळेत भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन संपन्न…

प्रतिनिधी- सुशील तांबे
राजापूर :-राजापूर तालुक्यातील कशेळी गावा मध्ये युवा ग्रुप वाडीवठार तर्फे सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमद्धे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमद्धे भव्य निबंध लेखन स्पर्धा उत्कृष्ट पणे संपन्न करण्यात आली.
प्रथमच कशेळीतील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मोठा उपक्रम राबवणारा युवा ग्रुप वाडीवठार यांचे विशेष आभार मानण्यात आले.
प्राथमिक शाळा ही एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंड ओळख होते. प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तिचे व आवडीचे शिक्षण असते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो.
शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे. निबंध लिहिणे ही एक कला आणि शैक्षणिक मूल्यमापनाचे एक साधन आहे. यांचे औचित्य साधून युवा ग्रुप वाडीवठार (कशेळी) तर्फे कशेळी गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कशेळी नं.०१, जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कशेळी नं.०२, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कशेळी नं.०३, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कशेळी नं.०४ आणि सुयोग विकास विद्यामंदिर जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कशेळी नं.०५ या पाचही प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दिनांक -: १०/०८/२०२४ रोजी, निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तरि या स्पर्धेसाठी पाचही शाळांमधुन एकुण ८६ विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता. कशेळी गावात युवा ग्रुप वाडीवठार हा आतापर्यंतचा सर्वात एकमेव ग्रुप आहे जो कशेळीत असलेल्या पाचही शाळेत निबंध स्पर्धेच्या आयोजन केलेला ग्रुप म्हणून संबोधले जात आहे.
तरि त्या निबंध लेखन स्पर्धेसाठी लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी माझी आई, माझी शाळा,तसेच माझा गाव हे विषय देण्यात आले होते तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण प्रदूषण, भारतीय संस्कृती, तसेच शिक्षणाचे महत्त्व असे विषय देवुन कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करण्यास सुचविण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळांचे केंद्रप्रमुख श्री.सुनील जायदे सर, तसेच पाचही शाळांचे मुख्याध्यापक श्री.अमिन तडवी सर, श्री.मनोज मिरगुले सर, सौ.संपदा देसाई मॅडम, सौ.नेहा पवार मॅडम, सौ.मुग्धा दाते मॅडम, शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे कशेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाशजी डुकळे, वाडीवठारचे ग्रामस्थ श्री.सचिन शिंदे, श्री.शांताराम डुकळे, श्री.विलास इंदुलकर, श्री.प्रशांत वाडकर, तसेच युवा ग्रुप वाडीवठार चे सदस्य श्री.भरत धावडे, कु.सुरज डुकळे, कु.राहुल वाडकर, श्री.सिद्धेश डुकळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
निबंध स्पर्धेचा पाचही शाळेमधुन विद्यार्थ्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादा मुळे सर्व शाळेतील शिक्षकांनी युवा ग्रुप वाडीवठार यांना कौतुकाची थाप मिळाली आहे.
युवा ग्रूप वाडीवठार तर्फे भव्य असे रक्तदान शिबीर आयोजित केले जाते.
तरि या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार, दिनांक -: ०९/०९/२०२४ रोजी, म्हणजेच युवा ग्रुप वाडीवठार (कशेळी) आयोजित रक्तदान शिबीरच्या दिवशी जाकादेवी मंदिर (कशेळी) येथे होणार आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी भविष्यातही युवा गृप वाडीवठार असे विविध उपक्रम राबविण्यात कटिबद्ध राहील.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com