शेततळ्यासाठी १०० % अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा …

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:- दि. १५ (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत २६६ कामे अनुज्ञेय असुन सदर कामांच्या माध्यमातुन गावा सोबतच गावातील लोकांचाही विकास शक्य होणार आहे . या योजनेच्या माध्यमातून ” मी समृध्द तर गाव समृध्द पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द ” संकल्पना राज्यात राबविण्यात येत आहे.

. पालघर जिल्हयामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असतांनाही उन्हाळयांत पाण्याचे दुर्भिक्ष जिल्हयाच्या बहूतांश भागात दिसुन येते. या परिस्थीतीवर मात करण्याकरीता जल पुर्णभरण व जलसंधारण कामांची आवश्यकता पाहता मग्रारोहयोच्या माध्यमातून पाणी भुगर्भात जीरविण्याकरीता “जलतारा ” तर शेत शिवाराकरीता तसेच मत्स्यंवर्धनाच्या हेतूने ” शेततळे ” मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.. याकरीता १००% अनुदान शासनामार्फत दिले जाते. जलतारा करीता ४८००/- [१.५०m x १.५०m x १.८०m] व शेततळे [ १० x १० x ३m], ते [३० x ३० x ३ मी] वरील शततळे १००% मजूरांमार्फत खोदल्यास अस्तरीकरण करीताही अनुदान १.७५ लक्ष ते ५.५० लक्ष (अंदाजित) योजनेच्या माध्यमातून दिले जाते.
याकरीता सर्व शेतकऱ्यांनी वरील कामांसाठीचे अर्ज ग्रामसेवक, कृषी सेवक, रोजगार सेवक तथा तहसिल कार्यालय (रोहयो शाखा) यांचेकडे देण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com