निर्यात प्रचालन ,निर्यात प्रोत्साहन कार्यशाळा संपन्न

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर,:

दि.9:- विकास आयुक्त (उद्योग) दिपेद्रसिंग कुशवाह यांच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग केंद्र ,पालघर यांच्या वतीने सातिवली ,वसई पूर्व या ठिकाणी जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा निर्यात प्रोत्साहन कार्यशाळा संपन्न झाली.
प्रास्ताविक करताना सहसंचालक विजू शिरसाट म्हणाल्या की, असोसिएशन, उद्योजक यांच्यासोबत बँकर्स आणि सरकारी अधिकारी समन्वयातून काम करीत आहेत. निर्यात क्षेत्रातही महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षामध्ये निर्यातीमधील जिल्ह्याचे योगदान वाढवण्याच्या दृष्टीने काम सुरू असून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना इन्फ्रास्ट्रक्चर, स्टँप ड्युटी, वीजबिल आदींमध्ये सवलत देण्यात येणार आहे. उद्योजकांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहनही श्री . शिरसाट यांनी केले.
राज्याच्या निर्यात क्षेत्रात जिल्ह्याचा वाटा 5 टक्के आहे ते प्रमाण वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यात निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीच्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात प्रचालन कार्यशाळा उपयुक्त असल्याचे विजू शिरसाट यांनी सांगितले.
रूद्र शेल्टर हॉटेल येथे आज जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आयोजित एक दिवसीय निर्यात प्रचालन कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती विजू शिरसाट उद्योग सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे ५ लाख ५६ हजार कोटी एवढे योगदान आहे, त्यात जिल्ह्याचे 28हजार कोटीचे योगदान आहे. जिल्ह्यात एक लाखांपेक्षा जास्त उद्योजकांनी उद्योजकता प्रशिक्षण घेतले आहे. निर्यात वाढवण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जीआय टॅग असलेली चिक्कू, वारली पेंटिंग आणि बाहाडोली जांभूळ आणि ODOP मरीन प्रोडक्ट व फिश प्रोडक्ट या उत्पादनावर प्रक्रिया करून नवीन प्रोडक्ट तयार करून एक्सपोर्ट करावेत असे आवाहन केले.
या कार्यशाळेस कोकण विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, डीजीएफटी विश्वजीत चिमणकर, अपेडाच्या प्रणिता चवरे , एमएसएसआयडीसीच्या शुभांगी नानवटकर, EEPC चे प्रतापसिंग भरडा , नाबार्ड चे सुधांशू कुमार अश्विनी, FIEO रिशू मिश्रा, पोस्ट ऑफिसचे सतीश मिश्रा सर आदीनी पीपीटी द्वारे निर्यात वाढवण्यासाठी मुलभुत गोष्टी पासून माहीती दिली.


जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, त्यांच्यासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाच्या विविध योजनांची माहिती बैठकीत देण्यात आली. कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातीसंबंधित कामकाज करणारे घटक उपस्थित होते.

शेवटी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उद्धव माने यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी माहिती देऊन सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट