पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जनाधिकार या जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– शासन आपल्या दारीची नुसतीच बात…! आम्हीच देतो जनतेस साथ…!! या वाक्याचे घोषणापत्र लावत विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानपरिषद शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीनगर अंबादास दानवे साहेब यांनी 2/02/2024 सकाळी 10 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत पालघर येथे काँग्रेस भवन हॉल कचेरी रोड पालघर या ठिकाणी जनाधिकार तुमच्या हक्काचे जनता दरबार तुमच्या समस्येचे त्वरित निवारण असे फलक लावत जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते.

जनता दरबारात १४६०निवेदने प्राप्त झाली बहुसंख्य निवेदने सामाजिक म्हणजे ज्या प्रश्नां मुळे हजारो नागरिक हैराण आहेत असे विषय त्यात होते.

जिल्ह्यातील नागरिक उपस्तीत होते.ते ही स्वतः च्या वाहनाने,रेल्वेने,बसने प्रवास करून आले होते. दिलेले निवेदनात
उड्डाणपूल होण्याबाबत केळवे रोड (पूर्व – पश्चिम) उड्डाणपूल नसल्याने हजारो रहिवासीयांचे गैरसोय होत असले बाबत तसेच पालघर (पूर्व) कमारे ते वाकसई खेरेपाडा चौकीपाडा ते केळवे रोड संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.

रस्ता दुरुस्ती करण्याबाबत तसेच मोठ्या संख्येने शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त रहिवासी यांच्या हितासाठी लवकरात लवकर पालघरला पुणे कडील ट्रेनला पालघर स्टेशनला थांबा मिळावे .असे अनेक मुद्दे जनाधिकार दरबारी अंबादास दानवे साहेब यांच्या दरबारी मांडण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित मंडळी, उद्धव शिवसेना गटाचे पदाधिकारी तसेच पालघर जिल्हा रहिवासी व पत्रकार परिषद असे बहुसंख्येने लोक जमा होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट