डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील-पालकमंत्री रविंद्र चव्हाण….

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर:– दिनांक. २३ फेब्रुवारी २०२४ डहाणू क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण असून या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षनाचे केंद्र बनेल. डहाणू महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

डहाणू महोत्सव 2.O चा शुभारंभ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाला त्यातेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार सुनिल भूसारा, विनोद निकोले, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक आणि पर्यटक उपस्थित होते.

पालघर डोंगरी, सागरी, नागरी क्षेत्र लाभलेला जिल्हा असून डहाणू क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला असून त्यामुळे डहाणू हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉटर स्पोर्टस् येणाऱ्या काळात सुरू होईल. डहाणू महोत्सवामध्ये पर्यटक विविध स्पॉटला भेटी देऊन इच्छीत साहित्य खरेदी करत आहेत.

नविन उद्योजकांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यवसाय वृध्दीची संधी उपलब्ध होणार आहे. या महोत्सवामध्ये विविध राज्यातील पर्यटकांनी हजेरी लावली असून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट