पणदेरीतील साखळी बंधाऱ्यामुळे जनतेला पावसाळ्यापर्यंत मुबलक पाण्याची विशेष व्यवस्था…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

मंडणगड: रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पाणी टंचाइची झळ सर्वांना सोसावी लागत आहे. ट्यांकरनी पाणी पुरवठा केला जात आहे परंतु गेल्या डिसेंबर मध्ये पंदेरी नदीवर साखळी बंधारे बांधण्यात आले. त्याचा फायदा पंदेरी परिसरातील सर्व ग्रामस्थांना झाला त्यामुळे आज रोजी पर्यंत पंदेरी परिसरातील जनतेला पाणी मुबलक मिळत आहे जिल्ह्यातील पाणी टंचाइची परिस्थिती बघता यावेळी पंदेरी नदीवर बांधलेले साखळी बंधारे फायदेशीर ठरले आहेत.

जून महिन्याच्या शेवट पर्यंत म्हणजेच पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा असाच असणार आहे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या बंधाऱ्यासाठी मंडणगड दापोली खेडचे लोकप्रिय आमदार श्री योगेश दादा कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच हे काम करण्यासाठी पंदेरी ग्राम पंचायतनेही पत्र व्यवहार केले होते . तसेच हे काम पूर्णत्वास नेण्यास संबंधित खात्याकडे श्री. सुजित देवकर यानीही वेळोवेळी संपर्क साधले होते.

info@surakshapolicetimes.com

यावेळी जलसंपदा कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश पाटील ,जलसंपदा उपविभागीय अधिकारी दापोली श्री. चंद्रकांत यादव , कामत साहेब , विकास जाधव साहेब , अधीक्षक अभियंता नारकर मॅडम यांचे पंदेरी जनतेकडून विशेष आभार मानण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट