ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे तलावाच्या भरावालगत लागलेली आग विझवण्यात ग्रामस्थांना यश :
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :-मोठा अनर्थ टळला आहे. शुक्रवार दिनांक 22/03/2024 रोजी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील धुमाळवाडी ता. फलटण जिल्हा सातारा,गावातील तलावाच्या भरावा लगत दुपारी 12 वाजता आग लागलेली आहे आणि भरावा शेजारीच फॉरेस्ट,पाईप,वायर,जनावरांचा चारा(कडबा,गवत) मोठ्या प्रमाणात आहे, हे लक्षात येतातच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री शरद कैलास पवार यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून तात्काळ ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील तरुण मदतीसाठी धावले व तलावाच्या भरावालगत लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात आली. व ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे मोठा अनर्थ टळला
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com