जनसंवाद अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
पोलीस दलाचा सर्वसामान्य जनतेशी चांगला सुसंवाद व समन्वय राहावा तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये शांतता व सुरक्षीतता अबाधित राहावी, या निमित्ताने बाळासाहेब पाटील (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, पालघर यांचे संकल्पनेतुन “जन संवाद अभियान” सुरु करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दि.२३/०१/२०२५ रोजी तलासरी पोलीस ठाणे आणि तलासरी इंडस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ठक्करबाप्पा विदयालयाच्या मैदानात ता. तलासरी जि. पालघर येथे करण्यात आले.





जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पालघर, वसई, विरार, डहाणु, तलासरी, वाडा, विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यातील एकुण १६ संघानी सहभाग घेतला होता. या जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर खेळाडु व जनतेला खेळभावनेतुन शारीरिक मजबुती तसेच खेळ वृत्ती निर्माण करुन खेळाडु निर्माण व्हावेत. तसेच संस्कार आणि शिक्षण घेणे खुप गरजेचे आहे. जो शिकेल, तोच टिकेल यासाठी प्रत्येकाने उच्च शिक्षण घेऊन कुटुंबासह समाजाचाही विकास घडवुन आणवा. जनता आणि पोलीस यामध्ये संवाद साधला जावा, व्यक्तीगत विकासाबरोबर समाज हिताचा विचार, बुध्दिमत्ता विकास तसेच होतकरु खेळाडुंना पुढे वाच मिळवा याकरीता मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर डहाणु विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी खेळांत प्रत्यक्ष सहभाग घेऊन प्रतीस्पर्धी संघावर चढाई केली आणि खेळात रंगत आणली.
सदर स्पर्धेत सहभागी झालेल्यापैकी १) प्रथम क्रमांक शिवशंभो बोईसर, २) व्दितीय क्रमांक- कुर्लाई क्रिडा मंडळ, सफाळे ३) तृतीय क्रमांक आई गावदेवी डहाणु) चतर्थ क्रमांक जरीमाता धाकट