भिवंडीत एका १६ वर्षीय दलित मुलावर प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाईची मागणी…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-फुले,शाहू,आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात कोणतेही सरकार असल्यास दलित, आदिवासी बांधवांवर अजून पर्यंत अन्याय अत्याचार झालेले थांबताना दिसत नाहीत. यांचे जिवंत उदाहरण म्हणजे दि.१४/०२/२०२४ रोजी भिवंडी शहरात किरकोळ कारणावरून शिवसेना शिंदे गटातील भिवंडीतील विभाग प्रमुख कैलास धोत्रे व त्यांचा मुलगा देवा कैलास धोत्रे, त्यांचा भाचा करण लष्कर आणि इतर १८ ते २० लोकांनी दलित १६ वर्षीय संकेत सुनील भोसले या तरुणाची निर्दयी रित्या अमानुषपणे ठिकठिकाणी नेऊन जबर मारहाण केली त्यात त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही माणुसकीला काळीमिया फासणारी घटना आहे. सदर गुन्हा करून वरील आरोपी फरार आहेत.या घटनेमुळे संपूर्ण दलित समाजातील तीव्र संतापाची लाट उसळली आहे.वरील आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून वरील संबंधित सर्व आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देऊन कठोरात कठोर कारवाईची रिपाई (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने मागणी करीत आहोत. तसेच संबंधित घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत.

असे अर्जद्वारे निवेदन आरपीआयचे (आ )चे जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिले
वरील घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी रिपाई च श्री.देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य – मुंबई)यांना मेल द्वारे निवेदन तसेच पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. त्यावेळी आयु. सुरेश जाधव (जिल्हा अध्यक्ष पालघर ) आयु. सचिन लोखंडे (कार्याध्यक्ष पालघर जिल्हा ) आयु. कुंदन मोरे (उपाध्यक्ष पालघर जिल्हा ),आयु.पुष्पराज फुलारा (जिल्हा संघटक पालघर ) आयु.शरद जाधव (युवा अध्यक्ष पालघर तालुका )आयु. राम ठाकूर (युवा उपाध्यक्ष पालघर तालुका ) आयु. बिरबल खुशवाह युवा कार्यकर्ता, आयु. तुषार आडीवडेकर युवा कार्यकर्ता व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट