दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते संपूर्ण देशात स्वामीत्व योजने अंर्तगत मिळकत पत्रिका/सनद वितरण कार्यक्रमाच्या अनुषगांने तयार केलेली पालघर जिल्हयाची सविस्तर माहीती…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक २२/०२/२०१९ अन्वये प्रत्येक गावातील गावठाण मिळकतीचे GIS (Grographical Information System) सव्र्व्हेक्षण करुन मालमत्ता पत्रक व सनद तयार करण्यास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्याची ही योजना केंद्र शासनाने स्वामीत्व योजना या नावाने दिनांक २४/०४/२०२० पासुन संपुर्ण देशात लागु केली.पंतप्रधानांनी २४ एप्रिल २०२० रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावांतील गावठाण क्षेत्रातील घरांसाठी मालमत्ता पत्रक देणे हा आहे. सदर प्रकल्प ग्राम विकास विभाग, भूमि अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग यांचे संयुक्त सहभागाने राबविला जात आहे. राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनींचे GIS आधारीत सर्वेक्षण व भूमापन करणेबाबतचा महत्वकांक्षी प्रकल्प मा.जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांचेकडील पत्र क्र. गावठाण/भूमापन/ड्रोन सर्व्हे/ गावठाण/जा.क्र.९९ व १०० पुणे दि. २१/०६/२०१९ अन्वये हाती घेण्यात आला. यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्रांचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामिण समुदायांना त्यांच्या राहत्या जागेच्या सर्व्हेक्षणाअंती मालमत्ता पत्रक/सनद स्वरुपात मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा देते, यामुळे ग्रामीण लोकाच्या आर्थिक समावेशात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यात ही योजना यशस्वी ठरत आहे.या प्रक्रीयेत सर्व प्रथम संबधित गावाची गावठाण हदद निश्चित केली जाते. त्या नंतर गावठाण व पाडयाची KML File तयार करुन भारतीय सर्वेक्षण विभागाला पुरविण्यात येते. त्याआधारे ड्रोन व्दारे सर्वेक्षण केले जाते. ड्रोन मध्ये असलेल्या high resolution camera व्दारे घेतलेल्या प्रतिमावर प्रक्रीया करुन गावठाणातील जागाचा नकाशा तयार होतो. सदर नकाशाप्रमाणे जागेवरील वस्तुस्थिती पडताळणी केली जाते आणि आवश्यक ते बदल करुन नकाशा अंतीम केला जातो. ग्रामपंचायतीकडील नमुना ८ अ प्रमाणे धारकांची खात्री करुन मालमत्ता पत्रक व सनदा तयार केल्या जातात. ही सर्व माहीती डीजीटल स्वरुपात साठवीली जात असल्याने सर्वाना ती सहज उपलब्ध होउ शकते. यामुळे कोणत्याही व्यक्तीला आपल्या घराच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणुन मालमत्ता पत्रक वापरता येणार असल्याने त्याच्या सामाजिक दर्जा उंचावून आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. पालघर जिल्हयातील भारतीय सर्वेक्षण विभागाकडुन एकुण ७६७ गावाचे ड्रोन फ्लाईंग करण्यात आले असून त्यापैकी ५३३ गावाच्या मालमत्ता पत्रक / सनद तयार झालेल्या असुन एकुण मालमत्ता पत्रक/ सनद संख्या ३५४७३ इतकी आहे. आत्तापर्यत पालघर जिल्हयातील एकुण १९१ गावामध्ये ७८१३ नागरीकांना प्रत्यक्ष त्यांचे गावी जावुन सनद वाटप करण्यात आले आहे. हे काम भूमि अभिलेख विभागाने कोणताही अतिरिक्त कर्मचारी वर्ग न वापरता दैनदिन कामकाज साभाळुन ग्रामविकास विभागाच्या मदतीने पुर्ण केले आहे. त्याचप्रमाणे उदया दिनांक १८/०१/२०२५ रोजी पालघर जिल्हयातील ४९ गावातील ३५८७ नागरीकांना प्रत्यक्ष गावी जावुन वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हयातील एकुण १८ नागरीकांना प्रतिनिधीक स्वरुपामध्ये मा. मत्री महोदय वने व मा. लोकप्रतिनिधी यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सकाळी १०.०० वाजता वाटप करण्यात येणार आहे.