बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाचे अपहरणठाणे पोलीस दलाच्या विशेष पथकाने १० जणांच्या टोळीला ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :– मुंबईत केलेल्या २ कोटी ७५ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून सुटकेसाठी ठाणे जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाचे अपहरण करून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या १० जणांच्या टोळीला तुरुंगात धाडण्यात आले. या कारवाईसाठी विशेष १५ अधिकारी व ८० अंमलदारांचे पहथक नेमण्यात आले होते. बुधवारी पडत असलेल्या धो धो पावसात या विशेष पथकाने तरुणाची १२ तासांत सुटका केली.
२४ सप्टेंबर २०२४ रोजी बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षीय मुलाच्या स्विप्ट कारचा एका ईर्टीगा कारने पाठलाग करून, चार्म्स ग्लोबल सिटी, अंबरनाथ पुर्व येथे त्याचे कारला ईर्टीगा कार आडवी लावुन जबरदस्तीने धमकावुन त्यास स्विष्ट कारमधुन उतरवुन हटिंगा कारमध्ये बसवुन अपहरण केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना फोन करून ४ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीतर मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा रजि नं १२५२/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४०.३(५) प्रमाणे दाखल केला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी १५ पोलीस अधिकारी व ८० अंमलदारांची ८ तपास पथके नेमण्यात आली. वरिष्ठांनी केलेल्या मागदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस पथकातील अधिकारी/अंमलदारांनी गुन्ह्याचे घटनास्थळ व अंबरनाथ परिसारातील ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. खंडणीसाठी वापरलेला मोबाईल कक्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान ईर्टीगा कारला बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
तपासाचा अर्धा टप्पा गाठल्यानंतर आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर आवाहन होते. तर दुसरीकडे मुलाच्या सुटकेसाठी वारंवार फोन करून पैशांची मागणी होऊ लागली. ४० कोटी देण्यास शक्य नसल्याचे मुलाच्या वडिलाने सांगताच त्यांनी तडजोडीअंती ७ कोटी रूपये मागितले तेही शक्य नसल्याने अखेर २ कोटी घेण्यावर आरोपी ठाम राहिले. सदरची रक्कम ही ओला कारमध्ये ठेवून, कार नंबर त्यांना पाठविण्यास सांगीतले होते. अपहरण झालेल्या मुलांचे जिवास कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी पोलिसांच्या सांगण्यानुसार २ कोटी रूपये देण्यास मुलाच्या वडिलांना सांगितले.
दरम्यान, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदारांनी खासगी दुचाकी, चारचाकी वाहने एम आय.डी.सी., बदलापुर पाईप लाईन रोड परीसरात पाठवून ओला कारवर पाळत ठेवुन, पाठलाग केला. रात्रीची वेळ व जोरदार पावसात आरोपी हे ओला कार चालकास वारंवार फोन करून ठिकाण बदलून पोलिसांची दिशाभूल करू लागले. मात्र काही झाले तरी मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी पोलिसांनी ओला कारचा पाठलाग सुरूच ठेवला. पोलीस आजुबाजुला असल्याचा संशय आल्याने आरोपींनी फिर्यादीला फोन करून मुलगा २० ते २५ मिनीटांत घरी येईल, असे बोलुन फोन कट केला. पोलिसांनी त्वरित त्यांचे मोबाईलचे लोकेशन तपासले असता आरोपी पिसे डॅम, वासेरेगांव, पडघा, भिवंडी येथे असल्याचे समजले. त्या ठिकाळी जाऊन शोध घेतला असता डॅमचे जवळ अपहरण झालेला मुलगा मिळला.
मुलगा मिळाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा आरोपींचे मोबाईलचे लोकेशन तपासून निखील राजुसिंग लबाना व्यवसाय मोबाईल सिम विक्री यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने विनेश राजु अडवाणी यास सदर सिम कार्ड दिल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व तांत्रिक माहितीवरून आणखी १० जणांना अटक केली. या आरोपींकडून कार, गावठी बनावटीचे स्टिलचे एक पिस्टल व तीन काडतुसे, एक एअर पिस्टल, एक लोखडी धारदार सुरा, लाल रंगाची नायलॉन दोरी, काळया रंगाचे मास्क व ५ मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ६२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्यान या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६०,४९,५५,५६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,४,२५ सह म.पो.का. कलम ३७(१)१३५ हे कलम वाढ करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीत यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता यातील आरोपी देविदास दत्तात्रय वाघमारे, दत्तात्रय नामदेव पवार यांनी मुंबई महानगरपालिका अंतर्गत फायरमैन भरतीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील मुलांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन त्यांच्याकडून प्रत्येकी ८ ते १० लाख रूपये असे एकुण २ कोटी ७५ लाख रूपये स्वीकारून त्यांनी फसवणूक केलेबाबत त्यांचेविरोधात मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८१/२०२४ भा.द.वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे २४ जुलै २०२४ रोजी दाखल असून या गुन्ह्यात ते जामीनावर असल्याचे समोर आले. त्यांनी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून घेतलेले पैसे परत करण्यासाठी मुलाच्या अपहरणाचा कट रचल्याचे उघडकीस आले.
या गुन्ह्याचा उलगड अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस परिंडळ ४ चे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे, वपोनि जगन्नाथ कळसकर, वपोनि अशोक भगत, वपोनि अनिल जगताप, वपोनि अशोक कोळी, पोनि किशोर शिंदे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / श्रीरंग गोसावी, सपोनि / विजय काजारी, सपोनि / संदीप भालेराव, सपोनि श्रीकृष्ण गोरे, पो. उपनिरी/दराडे, स.पो. उपनिरी/बबन बांडे, पोहवा/किरण चौधरी व इत्तर ८० पोलीस अंमलदारांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com