जिल्हा परिषद पालघर येथे वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी…

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :- दिनांक 17/ 10 /2024 रोजी जिल्हा परिषद पालघर येथे वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


वाल्मिकी हे पहिल्या संस्कृत काव्याचे (आदिकाव्य) रचनाकार होते जे जगभर महाकाव्य रामायण (भगवान रामाची कथा) म्हणून ओळखले जाते , म्हणून त्यांना आदिकवी किंवा पहिला कवी असे म्हणतात. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.
अशा थोर ऋषींची आज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) सोनाली मातेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com