अत्यंत दुर्दैवी घटनेत , ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करून जलद गतीने एका हरवलेल्या मुलाचे शोध कार्य करण्यात ग्रामस्थ व पोलीस दलास यश..

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :- वाठार पोलिस स्टेशन हद्दीतील हिवरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गावातील 12 वर्षाचा कु.विक्रम विजय खताळ हा चप्पल शेतात राहिल्याने तो वडिलांना सांगून चप्पल आणण्यासाठी शेतात आला, परंतु त्यानंतर तो घरीच न आल्याने त्याच्या आई-वडिलांच्या जणू काळजाचा ठोका चुकला होता.
आई-वडिलांनी गावात सगळीकडे शोधाशोध केली;परंतु तो सापडला नाही, मुलगा बेपत्ता झाल्यामुळे त्याच्यासाठी व्याकुळ झालेल्या आईची व्यथा जाणून घेताच, सायंकाळी सातच्या सुमारास गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन रामदास खताळ यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून(18002703600) संपूर्ण गावाला व परिसरात घटनेची माहिती दिली आणि गावातील हालचाली वाढल्या संपूर्ण गाव एकवटले आणि मुलाचा शोध सुरू झाला.
युवकांनी त्यांच्या कुंभारकी येथील शेतातील प्रत्येक सरीत शोधा शोध करायला सुरुवात केली आणि अखेर उसाच्या एका सरीमध्ये उसाच्या पाचोट्याने झाकून ठेवलेला विक्रमचा मृतदेह आढळला. अत्यंत दुर्दैवी घटनेत ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 30 मिनिटात मृतदेह सापडण्यात ग्रामस्थांना व वाठार पोलिसांना यश आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com