अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर


दिनांक 26 : पालघर जिल्ह्यात दि.06 व 07 मे 2025 या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पुर्णतः नष्ट झालेली 4 घरे व अंशतः नष्ट झालेली 2120 असे एकुण 2124 घरांचे व 4 झोपडयांचे तसेच बागायत शेतीचे 1923 शेतकऱ्यांचे 537.68 हेक्टरक्षेत्राचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असून फळपिकांचे 5598 शेतकऱ्यांचे 2162.79 हेक्टरक्षेत्राचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

नुकसान झाल्याने बाधितांना मदत देण्यासाठी रु.1,20,15,195/- ( एक कोटी वीस लाख पंधरा हजार एकशे पंचावण्ण रुपये मात्र) इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठीचा शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.
शेतीपिके / फळपिकेः-
या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बागायत शेतीचे 1923 शेतकऱ्यांचे 537.68 हेक्टरक्षेत्राचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असून फळपिकांचे 5598 शेतकऱ्यांचे 2162.79 हेक्टरक्षेत्राचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामवसेवक व कृषिसहायक यांच्याद्वारे करण्यात आलेले असून बाधितांना मदत देण्यासाठी रु.9,23,77,800/- (अक्षरी नऊ कोटी तेवीस लाख सत्याहत्तर हजार आठशे रुपये ) इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठीचा शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.
बोटी व सुकी मासळी:-
दि.06 व 07 मे 2025 या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे 99 बोटींचे अंशतः नुकसान झालेले असून 2 बोटींचे पुर्णतः असे एकुण 101 बोटींचे नुकसान झालेने त्यांना मदत करण्यासाठी एकुण रू.6,24,000/- (सहा लाख चोवीस हजार रू) इतक्या निधीची आवश्यकता आहे. तसेच 2 बोटींचे जाळयांचे पुर्णतः नुकसान झाले असल्याने सदर शासन निर्णयानुसार 8,000/- (अक्षरी आठ हजार रूपये इतक्या निधीची आवश्यकता असल्याने बाधितांना मदत करण्यासाठी रु. 6,32,000/- (सहा लाख बत्तीस हजार रुपये मात्र) इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठीचा शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.
तसेच सुक्या मासळीचे नुकसानी करीता मदत अदा करणेबाबत महसुल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक: सीएएस-2022/प्र.क्र.349/म-9 दि.27.03.2023 मध्ये कोणतीही तरतुद नसल्याने विशेष बाब म्हणून मदत करण्यासाठी पालकमंत्री मा. ना. श्री गणेश नाईक यांनी मा. मुख्यमंत्री, मत्सव्यावसाय मंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे आग्रही विनंती केलेली आहे.
वर नमुद केल्या नुसार घरे, झोपड्या, शेतीपिके ,फळपिके, बोटी व सुकी मासळी यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून निधी प्राप्त होताच संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत बाधितांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच दिनांक 23 मे 2025 रोजी पालघर जिल्ह्यात पुन्हा झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे 1030 घरांचे अंशत: नुकसान झालेले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट