अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम”

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि २६ डोंबिवली ठाणे





जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत आशुतोष डुंबरे (पोलीस आयुक्त, ठाणे शहर,) संजय जाधव, (अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण,) अतुल झेंडे, (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण,) सुहास हेमाडे, (सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, ) डोंबिवली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आठवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने डोंबिवली पोलीस ठाणे येथे खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
१) दि२४रोजी १५:४५ वा. ते १६:३० वा. चे दरम्यान डी. एन. सी. विद्यालय, डोंबिवली पुर्व येथे सपोनि/प्रविण घुटुगडे व पोहवा/गणेश गिते यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेतला. सदरवेळी ०२ शिक्षक, ७० ते ८० विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
२) दिनांक २५ रोजी ११:१० वा. ते १२:१५ वा. चे दरम्यान स.वा. जोशी विद्यालय व महाविद्यालय, डोंबिवली पूर्व येथे सपोनि/एल. बी. बोरा व पोहवा / गणेश गिते, पोलीस अंमलदार / अमित देसाई यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेतला. सदरवेळी श्री. नलावडे मुख्याध्यापक, ०७ शिक्षक, १२५ ते१५० विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
३) दिनांक २५रोजी १५:२५ वा. ते १६:५० वा. चे दरम्यान बी. आर. मढवी कॉलेज, डोंबिवली पुर्व येथे वपोनि/श्री. गणेश जवादवाड, श्री. अमोल मडामे (नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य) व सपोनि/एल. बी. बोरा यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेतला. सदरवेळी ०१ प्राचार्य, ०६ शिक्षक, १३० ते१५० विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.सदर अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वरील विद्यार्थी यांना माहिती देवून, अंमली पदार्थाचे सेवनापासुन परावृत्त करणेबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीकडुन खाद्य पदार्थ स्विकारू नका, एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य बदलु शकत, अंमली पदार्थाचे सेवन हे क्षणिक समाधान देत. पण कायम स्वरुपी वेदना आणि विनाश मागे ठेवते. आई वडीलांची स्वप्न, मित्रांची साथ, खतःचे भविष्य सगळ संपवत, आज एक पाउल पुढे टाका, ड्रग्ञ्जला नाही म्हणा आणि आयुष्याला हो म्हणा. अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे मृत्युला आमंत्रण, चला नशा मुक्त भारत घडवुया. नशा नाही, दिशा हवी’ तसेच चरस, गांजा, ड्रग्जचे सेवन करताना किंवा विक्री करताना कोणीही आढळल्यास डायल ११२ यावर माहिती द्या, आपला क्रमांक गोपनिय ठेवला जाईल याबाबत जनजागृती करण्यात आली.