अखेर देशातील शेतकरी आंदोलनाला यश -अँड. सविता शिंदे

सोलापूर :करमाळा दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींनीनी गुरुनानक जयंतीदिनी केंद्र सरकारच्या अध्यादेशाने लागू केलेले ३ कृषी कायदे रद्द करणार असल्याच्या घोषनेचे स्वागत करत असल्याचे ऍड. सविता शिंदे यांनी सांगितले.
ऍड. सविता शिंदे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी नाही पण किमान येत्या काळात पंजाब व उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन का होईना केंद्र सरकारला शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे लागले. हा एक वर्षा पासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विजय आहे.
वर्षभरात आंदोलनातील सुमारे ७५० शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. पंतप्रधानांनी हा निर्णय लवकर घेतला असता तर या शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. गेल्या वर्षभरापासून कडाक्याची थंडी, ऊन, पाऊस कशाचीही पर्वा न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. जगातले कदाचित दीर्घकाळ चाललेले हे एकमेव आंदोलन आहे.
केंद्र सरकारने ३ कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली असली तरी कृषी मालाच्या आधारभूत किमतीबाबत कायदा करण्याची व प्रस्तावित विज बिल विधेयक मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणे अध्याप बाकी आहे. अशी प्रतिक्रियाही ऍड. सविता शिंदे यांनी दिली.
ऍड. सविता शिंदे म्हणाल्या की, कितीही अन्यायय, क्रूर वा पाशवी बहुमत असलेले सरकार असले तरी लोकशाहीमध्ये लोकशक्तीच्या रेट्यापुढे झुकू शकते हे शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे अन्याय व हुकूमशाही विरोधातली लढाई लढणे हाच चांगल्या समाजनिर्मितीसाठी पर्याय असू शकतो.
ऍड. सविता शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या या लढाईत सहभागी झालेल्या सर्व संघटनांचे अभिनंदन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com