अहमदनगर राहुरी कोर्टातील वकील दाम्पत्य स्व.आढाव यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ ३१ जानेवारी २०२४ रोजी बोरीवली वकीलांतर्फे कामबंद आंदोलन…

संपादिका – दिप्ती भोगल
बोरीवली :-महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयातील वकिल म्हणुन काम करणारे कालकथित स्व.आढाव दाम्पत्य यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.
कायद्याचे संरक्षण करणारे वकिल यांचीच तीपण अपहरण करून हत्या ही अतिशय निंदनिय बाब आहे.
अशा वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी अॅडव्होकेट बोरीवली बार असोसिएशनच्या मार्फत एक अति महत्त्वाची आणि तातडीची बैठक दुपारी १२ : ३० दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत सर्व कमिटी मार्फत या घटनेची गंभीर दखल घेत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच याबाबत बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी संपुर्ण बोरीवली कोर्टाचे कामकाज बंद ठेवण्याचे लेखी पत्र सर्व न्यायाधीशांना देवुन कामबंद आंदोलन करण्याचे ठराव या बैठकीदरम्यान सर्व वकील बांधवाना देण्यात आले आहेत तसेच जे वकील ३१ जानेवारी २०२३ रोजी आंदोलनात सहभाग घेणार नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या बैठकीत पीडित वकील दाम्पत्य स्व.आढाव यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची,आरोपीला फाशीची शिक्षा व आता तरी वकील संरक्षण कायदा लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. अशी माहिती आज जवळजवळ महिनाभर पाठपुरावा करणाऱ्या अॅडव्होकेट श्री. अमर घोसाळे यांनी दिली.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com