१२ वर्षीय शाळकरी मुलाच्या खुनाच्या संवेदनशील व गंभीर गुन्हयातील आरोपी ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा व वाठार पोलीस ठाणे यांचेकडून जेरबंद

0
Spread the love

उपसंपादक -रणजित मस्के

सातारा :- दिनांक २३/१२/२०२३ रोजी मौजे हिवरे ता. कोरेगांव जि. सातारा गांवचे हद्दीत कुंभारकी नांवचे शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय १२ या शाळकरी अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून खून केला म्हणून वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून वाठार पोलीस ठाणे गुरनं, ३०३/२०२३ भादवि कलम ३०२, २०१, १८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची घटना ही अत्यंत संवेदनशिल व गंभीर असल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, व श्रीमती आँचन दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, अरूण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा व सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना सुचना दिलेल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि रविंद्र भोरे, पोउनि विश्वास शिंगाडे, पोउनि पतंग पाटील, पोउनि अमित पाटील यांचे विशेष पथक तयार करून सदर गुन्हयातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले होते. याच बरोबर बाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि शिवाजी भोसले यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिलेले होते.

हिवरे ता. कोरेगांव जि.सातारा या गांवात गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे व वाठार पोलीस ठाण्याचे पक्क नेमण्यात आलेले होते व सदरचं पथक मथत मुलाच्या खुनासंदर्भात माहिती घेत होते, सर्व शक्यतांचा अभ्यास करून खुन कोणी फेता असेल याबाबत माहिती घेत होते, मा. पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांप्रमाणे कार्यवाही सुरू होती, मथत मुलाच्या वडीलांनी दिलेल्या माहिती वरून व तेथील जवळपासचे साक्षीदार यांचेकडे केलेल्या विचारपूस व चौकशी वरून सदरचा गुन्हा हा त्याचे वडीलांनी केला असल्याबाबतचा संशय निर्माण झालेला होता. त्याप्रमाणे मुलाचे वडीलांनी दिलेली माहिती व इतर साक्षीदारांकडे दिलेली माहिती यामध्ये तफावत दिसून येत होती. पोलीसांना प्राप्त झालेल्या माहिती नुसार व मुलाचे वडील यांनी दिलेल्या माहिती वरून सदरचा खून हा त्याचे वडीलांनीच केला असल्याचा संशय अधिक बळकट झालेला होता त्यानुसार त्याचे वडीलांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता सदरचा खून हा त्यानेच केला असल्याची कबुली दिलेली आहे.

सदरचा खून करण्याचे कारण विचारता आरोपीने त्याला, केन्मार असल्याचा संशय होता व त्याचे मृत्यु पश्चात आपल्या मुलाचे कसे होईल, त्याचा कोण सांभाळ करील, त्यालाही केन्मार होईल, त्याचे हाल होतील या विवंचनेतून त्याचा रस्मीने गला आवळून खुन केला असलेबाबत कबुली दिली आहे. सदर कारवाई मध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमली आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, को राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगांव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, स.पो.मि. सुधीर पाटील, रविंद्र भोरे, वाठार पोलीस ठाणेचे सपोनि शिवाजी भोसले, पोलीस उप निरीक्षक, पतंग पाटील, विश्वास शिगाडे, मित पाटील, बाटार पोलीस अणेथे पोउनि संदीप बनकर, पोलीस अंमलदार सुधिर बनकर, संतोष सपकाळ, मंगेश महादोन् शरद वेवले, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्लना, प्रविण फडतरे, राकेश खांडके, अमोल माने, अजित कर्म, सनी आवटे, शिवाजी भिसे, स्वप्निल कुंभार, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओमकार यादव, स्वप्निल दोड, केतन शिंदे, रोहित निकम, पृथ्वीराज जाचव, वैभव सावंत, अमृत करें, विजय निकम, संभाजी साड्रेखे, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव, बाटार पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार नितीन भोसले, उदय जाधव, प्रशांत गोरे, गणेश इथापे, प्रतिक देशमुख यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट